Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, फक्त राहिला आहे तो खान’, राज ठाकरे यांचा खोचक टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिंडोशीत उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत राजकीय मैत्री केल्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांना टोला लगावला. यासाठी त्यांनी ठाकरे गटाच्या वर्सोवा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या नावाचा धागा पकडला आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, फक्त राहिला आहे तो खान', राज ठाकरे यांचा खोचक टोला
राज ठाकरे VS उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 8:34 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिंडोशी येथे प्रचारसभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला. “निवडणुकीच्या सभांमध्ये कंटाळा येत आहे. पाच वर्षांत जे काही घडलं ते तुम्ही पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडणूक चिन्ह गेले. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत खान राहिले आहेत. वर्सोव्यात हारून खान यांना तिकीट दिले आहे. उद्धव ठाकरेंचे उमेदवार उर्दू पत्रक काढते आहेत. मराठवाड्यात म्हण होती बाण की खान. उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला आहे. फक्त राहिला आहे तो म्हणजे खान. वर्सोवा उमेदवार हारून खान देण्यात आला. कडवट हिंदूत्व पासून ते कुठे गेले आहेत ? ते म्हणजे मुस्लिम उमेदवारापर्यंत गेली आहे. उर्दूमध्ये पत्र काढत आहेत”, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलां.

“दादर येथे शिवाजीपार्क येथे दीप महोत्सव साजरा केला जातो. मात्र कालच तिथे मीटर काढून घेऊन गेले. कारण फक्त की 14 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. सुरक्षेचे कारण देऊन काही करत असतो”, असं राज ठाकरे म्हणाले. “मुंबईत बांगलादेशी मुस्लिम आणि रोहिंग्यांची संख्या वाढत आहे. माझा मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. 48 तास दिले तर गुन्हे थांबतील”, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“दिवाळी आपला हिंदू सण आहे. सण सणासारखा साजरा करायचा नाही तर कशासारखा साजरा करायचा. दादरच्या शिवाजी पार्कात दरवर्षी तुळशीच्या लग्नापर्यंत लायटिंग असतो. दरवर्षाचा तो रिवाज आहे. या महाराष्ट्रात इथे दहीहंडीवर बंदी आणायला सुरुवात केली होती, गपणती मंडळांवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना उठली आणि हिंदूच्या सणावरती आलेली बंदी थांबली”, असं राज ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

“आज तिथेच हिंदुत्ववादी विचारांचे पंतप्रधान येत आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्ही दिवाळीचे लाईट बंद करत आहात, म्हणजे कमालच झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी आले असते तर दिवा बंद करणं हे मी समजू शकतो. ज्यांच्या डेक्यातच प्रकाश पिटत त्यांनी त्यांच्यासाठी दिवे तरी कशाला दाखवा? उद्धव ठाकरेंची सभा असती तर मी समजू शकतो की, त्यांना ते लाईट चालत नाहीत. त्यांना हिंदूच्या लाईटचा डोळ्यांना त्रास होतो. आपण समजू शकतो. पण पंतप्रधान येणार असतील तर तुम्ही दिवे बंद करत आहात. कशासाठी बंद करत आहात? त्या गोष्टीची काय गरज आहे?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

“इतक्या सगळ्या बाबतीत इतका गोंधळ आणि भेसळ झालाय की कुणाचा पायपूस कोणात नाही. आज इतके विषय आहेत, आज एक नवीन गोष्ट झाली आहे की, बांगलादेशी मुसलमान आणि रोहिंग्ये मोठ्या प्रमाणात मुंबईत शिरत आहेत. त्याचा रिपोर्ट असा आलेला आहे की, पुढच्या दहा वर्षात मुंबईतील हिंदू समाज 50 टक्क्यांच्या खाली येईल. हे इतकं प्रमाण वाढतंय. कारण या शहरात रोजच्या रोज कोण येतं कोण जातंय याचा पत्ता नाही”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.