AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajyasabha Election : राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांचं महत्व वाढलं, मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी बोलवली बैठक

या जागेवर सध्या शिवसेनेकडून दावा करण्यात येतोय. मात्र हे चित्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होतील. मात्र शिवसेने ही जागा काबीज करण्यासाठी कंबर कसताना दिसून येत आहे.. त्यामुळे राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Rajyasabha Election : राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांचं महत्व वाढलं, मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी बोलवली बैठक
मुख्यमंत्र्यांनी बोलावली अपक्ष आमदारांची बैठकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 10:36 PM

मुंबई : सध्या सहा जागांसाठी लवकरच राज्यसभेच्या निवडणुका (Rajyasabha Election) पार पडत आहेत. त्यामुळे आता त्या घडामोडींना वेग आलाय. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुन्हा जोमाने तयारी सुरू केली आहे. यात महाराष्ट्रातून निवडून जाणाऱ्या खासदारांची (Rajya Sabha MP) संख्या ही सहा आहे. यात भाजपकडून दोन खासदार राज्यसभेवर जाणार आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसना (Shivsena) यांच्या वाट्याला प्रत्येकी एक-एक जागा निवडून दिली जाणार आहे. तर एका जागेच गणित अजूनही कुणाच्या खात्यात जाणार हे ठरत नाही. या जागेवर सध्या शिवसेनेकडून दावा करण्यात येतोय. मात्र हे चित्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होतील. मात्र शिवसेने ही जागा काबीज करण्यासाठी कंबर कसताना दिसून येत आहे.. त्यामुळे राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

ही निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. परवा सायंकाळी म्हणजेच शुक्रवारी वर्षा या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांचे महत्व सध्या चागलेच वाढले आहे. सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरस होणार आहे.  महाविकास आघाडीत सहावी जागा शिवसेना लढणार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केलीय. त्यासाठी अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे डावपेच सुरू झाले आहेत. तसेच मतदानावेळी अपक्ष आमदारांना व्हीपचे बंधन नाही, त्यामुळे ही निवडणूक आणखी रंगदार होणार हे निश्चित झालंय.

कुणाला किती मतांची गरज?

राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 42 मतांची गरज आहे, असे चित्र सध्या दिसत आहे. भाजपकडे सध्या 113 आमदारांचं संख्याबळ आहे तर भाजपचे 106, रासप 1, जनसुराज्य 1 आणि 5 अपक्षांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदार आहेत. या संख्याबळानुसार भाजपचे दोन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल. तर सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढणार आहेत, त्यामुळे या निवडणुकीत आता नवं ट्विस्ट आलंय.

हे सुद्धा वाचा

संभाजीराजेंना कुणाचा पाठिंबा?

छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रवादी सहकार्य करण्याच्या तयारीत आहे. तर अपक्षमधील काही आमदारांचा पाठिंबाही संभाजीराजेंना आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने संभाजीराजेंना शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. मात्र ही निवडणूक अपक्ष लढण्यावर संभाजीराजे ठाम आहेत. त्यामुळे आगामी काळात भूमिका बदलणार की आहे त्या निर्णयावर ठाम राहणार यावरही ही निवडणूक अवलंबून असणार आहे.

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.