Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अबू आजमी यांनी चव सोडली, औरंगजेबाविषयी काय वक्तव्य केलं पाहा

कोल्हापुरात आज वातावरण बिघडलं. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून लोकप्रतिनिधी, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांकडून शांततेचं आवाहन केलं जात आहे. असं असताना आता अबू आजमी यांनी या प्रकरणात उडी घेत भूमिका मांडली आहे.

अबू आजमी यांनी चव सोडली, औरंगजेबाविषयी काय वक्तव्य केलं पाहा
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 6:45 PM

मुंबई : कोल्हापुरात औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं स्टेटस ठेवलं म्हणून आज हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं. या आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांवर दगडफेक झाली. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. संबंधित घटनेमुळे संपूर्ण राज्य सुन्न झालं आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंग्याचं उदात्तीकरण करणाऱ्यांना सोडणार नाही. पण कायदा कुणीही हातात घेऊ नये, असं म्हटलं आहे. असं असताना आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

“मी औरंगजेबाच्या सोबत आहे. त्यांचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल ते एक धर्मनिरपेक्ष राजा होते. त्यांनी अफगाणिस्तानातून येवून भारतवर्ष बनवलं. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे हिंदू आणि मुस्लिम राज्यकर्त्यांनी सत्ता चालवण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले, पण आज राजकीय फायद्यासाठी त्यांना धार्मिक रंग देऊन द्वेष पसरवला जात आहे, त्यात गोदी मीडियाचा मोठा हात आहे”, असं ट्विट अबू आजमी यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

अबू आजमी यांच्या ट्विटला शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ही बघा औरंग्याची औलाद! पत्रकाराच्या प्रश्नांना मुद्देसुद उत्तरे देता आली नाही की भाजपचे टॅग लावायचे हे यांचं राजकारण. हिंमतच कशी होते यांची शिवछत्रपतींच्या मुलुखात राहून औरंग्याचे उदात्तीकरण करण्याची?”, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.

कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मोलाचा सल्ला

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लोकप्रतिनिधींना मोलाचं आवाहन केलं आहे. त्यांनी या प्रकरणी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. “सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना माझं आवाहन आहे की, आपण सर्वांनी सुद्धा आपल्या सर्व अनुयायांना, आपल्या कार्यकर्त्यांना समाजात शांतता प्रस्थापित राहावी यासाठी प्रयत्न करण्याचं पूर्णपणे आवाहन करावं. आपणही त्यांना पाठबळ द्यावं, असं मी आवाहन करतो”, असं राहुल रेखावार म्हणाले.

“आपला देश लोकशाहीचा पुरसकर्ता आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान देशाबाहेर गेल्यावर सुद्धा आपल्या देशाला लोकशाहीची जननी आहे, असं म्हणतात. त्यामुळे या लोकशाहीवर आधारित असणाऱ्या देशाला, आपल्या संविधानाला कोणताही डाग लागू नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे”, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं.

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.