AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर मायुसी का?; संजय राऊत म्हणाले जाहीर सांगता येणार नाही

संभाजीनगरमध्ये राडा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या राड्यावरून शिंदे गटावर मोठा आरोप केला आहे. या राड्यामागे शिंदे गट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर मायुसी का?; संजय राऊत म्हणाले जाहीर सांगता येणार नाही
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 12:18 PM

मुंबई : संभाजीनगरच्या किराडपुरा भागात काल रात्री तुफान राडा झाला. दोन गटात झालेल्या हाणामारी आणि जाळपोळीत प्रचंड नुकसान झालं आहे. जमावाने पोलिसांच्या गाड्याही पेटवून दिल्या. त्यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळापासून या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. संभाजी नगरातील राडा संपला असला तरी आता राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर संभाजीनगरच्या दंगलीमागे डुप्लिकेट शिवसेना असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राऊत यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर मायुसी का? असा सवाल राऊत यांनी केला.

औरंगाबादेत तणावर निर्माण केला जात आहे. या मागे कोण आहे हे गृहमंत्र्यांना कळायला हवं. हे शिवसेना करत नाहीये. हे डुप्लिकेट शिवसेना करत आहे. या सरकारचा हेतू आहे राज्यात अशांतता निर्माण व्हावी असाच आहे. दंगली व्हाव्यात असा या सरकारचा हेतू आहे. गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न आहे, असं सांगतानाच संभाजीनगरला जे झालं, ते सरकारचं अपयश आहे. राज्यात अस्थिरता निर्माण व्हावी, तणाव कायम राहावा म्हणून मिंधे गट काम करतोय, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांना नैराश्य

सध्या जे फडणवीस दिसत आहेत ते पूर्वीसारखे फडणवीस नाहीत. फडणवीस निराश झाले आहेत. वैफल्यग्रस्त होऊन काम करत आहेत. त्यामागची कारणं शोधावी लागतील. जाहीर सांगता येणार नाही. त्यांच्या चेहऱ्यावर मायुसी का आहे? असा सवाल राऊत यांनी केला.

सरकारचं अस्तित्व नाही

राज्यातील मंत्री मंत्रालयात भेटत नाहीत. बाहेर सरकारचं अस्तित्व नाही. म्हणून तर कोर्टाला या सरकारला नपुंसक आणि अस्तित्वहीन सरकार म्हणावं लागलं आहे. या सरकारचा जीव खोके आणि पेट्यात आहे. ज्या सरकारचा जीव खोक्यात आणि पेट्यात असतो त्याला नपुसंक म्हणतात. कोर्टाने बरोबर तोच मुद्दा उचलाल. सत्यमेव जयते यालाच म्हणतात, असा चिमटा त्यांनी काढला आहे.

पुढची सभा पाचोऱ्यात

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सभेवरही भाष्य केलं. राज्यात महाविकास आघाडीच्या सभा दणक्यात होतील. मराठवाड्यातील सभा प्रचंड मोठी होईल. पुढची सभा पाचोऱ्यात होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

हातोडा मारण्याचं काम आम्ही केलं

अयोध्येतील राम मंदिरासाठी चंद्रपुरातील सागवान लाकूड नेण्यात येणार आहे. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचं योगदान अयोध्येच्या लढ्यात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान म्हणजे महाराष्ट्राचं योगदान आहे. तुम्ही लाकूड नेता चांगलं आहे. हातोडे मारण्याचं काम आम्हीच केलंस असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.