Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांच्यासोबतची ‘ती’ चर्चा… संजय राऊत शिवसेनेशी सहमत नव्हते!! म्हणाले, ‘भविष्य स्पष्ट दिसत होतं, मी तडक निघालो!!’

देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी एक घटनाक्रम सांगत आपल्या पक्षाचा कोणता निर्णय आपल्याला मान्य नव्हता ते सांगितलं.

अमित शाह यांच्यासोबतची 'ती' चर्चा... संजय राऊत शिवसेनेशी सहमत नव्हते!! म्हणाले, 'भविष्य स्पष्ट दिसत होतं, मी तडक निघालो!!'
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 7:20 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात पहाटेच्या शपथविधीवर मोठे गौप्यस्फोट केले. पहाटेच्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सहमती होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेविषयी सर्व चर्चा आपली शरद पवार यांच्यासोबतच झाल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घटनाक्रमावार पुन्हा चर्चा होऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे फडणवीसांच्या या गौप्यस्फोटावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडलीय. यावेळी त्यांनी एक घटनाक्रम सांगत आपल्या पक्षाचा कोणता निर्णय आपल्याला मान्य नव्हता ते सांगितलं.

“फडणवीसांनी पतंग उडवला. आम्ही एकत्र मतं मागितली. २०१४ साली भाजपने युती तोडली होती. त्यांना अहंकार झाला होता. तेव्हाच त्यांनी विश्वासघात केला होता”, असं संजय राऊत म्हणाले.

“ज्या भाजपला महाराष्ट्रात काळं कुत्र विचारत नव्हतं. त्या पक्षाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. अशा जुन्या भरोशाच्या मित्राचा घात भाजपने केला. नंतर 2019 मध्ये भाजपला कळलं, शिवसेनेशिवाय आपण जिंकू शकणार नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः ‘मातोश्री’ला आले. हॉटेल ब्लू सी येथे गेलो. मी तिथून निघालो”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

‘मी पक्षाशी तेव्हा सहमत नव्हतो’

संजय राऊत पुढे म्हणाले, “मला तेव्हाच भविष्य दिसत हो.ते मला व्यक्तीशः तो प्रकार आवडला नव्हता. हा मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळला जाणार नाही, हे माझ्या मनात पक्कं होतं. व्यासपीठावर देवेंद्रजी बोलत होते. सत्तेचं वाटप समान होईल. याचा अर्थ अडीच-अडीच वर्ष असा आम्ही काढला. प्रचारातही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस होईल, असं म्हटलं. तेव्हा आम्ही काही म्हटलो नाही. शिवसैनिक मुख्यमंत्री होणार, असं आम्ही फार सांगत सुटलो नाहीत.”

त्यावेळी उद्धव ठाकरे फोन घेत नव्हते?

संजय राऊत- त्यानंतर झालेल्या पेचात उद्धव ठाकरे फोन घेत नव्हते, असा आरोप केला गेला. हे खोटं आहे. संजय राऊत त्या चर्चेत नको होते, असा निरोप आला. मी खरं बोलतो. मी नाणं वाजवून घेतो.

‘बाळासाहेबांचे तसेच मोदींचेही फोटो वापरले’

राऊत– आम्ही युतीत लढलो. मोदी, अटलजी, बाळासाहेबांचे फोटो सगळ्यांनीच वापरले. आताही तेच फोटो वापरत आहेत. बाळासाहेबांचा फोटो त्यांना हवाच आहे.

‘2019 मध्ये भाजपची साइज कट करण्याचा प्रयत्न होता’

युतीत भाजपच्या जागांवर शिवसेनेने बंडखोर उभे केले, असा आरोप फडणवीस यांनी केला. भाजपची साइज कट करण्याचा प्रयत्न केल्याचंही वक्तव्य केलंय. यावर संजय राऊत म्हणाले, आमचे 33 लोकं या लोकांनी पाडले. ती लीस्ट आमच्याकडेही आहे. काही ठिकाणी नक्कीच फडणवीस प्रयत्न करत होते. बंडखोरी माघारी घ्यायला त्यांनी मदत केली. पण दुसरेही लोक होते. त्यांचे गौप्यस्फोट करायची ही वेळ नाही.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.