Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…तरच आपण विकसित भारताचे स्वप्न पाहू शकतो’, श्री श्री रविशंकर यांचं विधान

"मी जगातील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत पण माझ्या देशाच्या संस्कृतीच्या उन्नतीचे काम इतक्या वेगाने कुठेही झालेले नाही. मंदिरांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रथम रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरी करा", असं आवाहन श्री श्री रविशंकर यांनी केलं.

'...तरच आपण विकसित भारताचे स्वप्न पाहू शकतो', श्री श्री रविशंकर यांचं विधान
श्री श्री रविशंकर
Follow us
| Updated on: Apr 12, 2024 | 8:46 PM

“विकसित भारताची सुरुवात व्यक्तीच्या विकासाने होते, आम्हाला जुन्या मित्रांचा अभिमान आहे, नवीन तंत्रज्ञानाचा अभिमान आहे. आमचा वारसा आम्ही विसरलो होतो, आता आम्ही जागी झालो आहोत. गेल्या 10 वर्षांत देशाला आपल्या संस्कृतीचा आणि कलेचा अभिमान वाटू लागला आहे. याआधी लोक परदेशात गेल्यावर नावे बदलत असत, आता तशी परिस्थिती नाही. जगभर देशाचा मान वाढला आहे, पंतप्रधानांचे नेतृत्व बदलले आहे. देशातील प्रत्येक गरीबाला अन्न, वस्त्र, निवारा आणि शांतता मिळावी, हे रामराजांचे स्वप्न होते”, असं श्री श्री रविशंकर म्हणाले. मुंबईतील बोरिवली येथे गुरुदेव श्री श्री रविशंकर सत्संग विकास भारत कार्यक्रमाला आज 25 हजार लोकांची उपस्थिती लावली. या कार्यक्रमातून विकसित भारताचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री तथा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार पीयूष गोयल, खासदार गोपाळ शेट्टी आणि बॉलिवूड गायक सोनू निगम यांनीही हजेरी लावली. सोनू निगमने यावेळी श्रीरामांचे भजनही गायले.

“ज्यांना नकारात्मक भावना असतात ते जास्त सक्रिय असतात. यापासून दूर जावे लागेल, तरच आपण विकसित भारताचे स्वप्न पाहू शकतो. आजपर्यंत तुम्ही प्रत्येक रविवार आणि शनिवारी मन की बात पाहिली असेल, पण तुम्ही ते देखील करू शकता. या दिवसात भारतात जेवढे काम झाले, मी जगातील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत पण माझ्या देशाच्या संस्कृतीच्या उन्नतीचे काम इतक्या वेगाने कुठेही झालेले नाही. मंदिरांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रथम रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरी करा”, असं आवाहन श्री श्री रविशंकर यांनी केलं.

‘मतदान करणे हा आपला हक्क’

“संस्कृती आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी बाळगल्या तर भारताचा पूर्ण विकास होईल. लस सर्व देशामध्ये मोफत वाटली गेली, आपला देश प्रत्येकाला स्वतःचा मानणारा देश आहे. मुली वाचवा, मुलींना शिकवा, महिलांचा आदर करा. निवडणुका आल्या की मतदान करणे हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे. जे मतदान करत नाहीत त्यांना विचारा की त्यांनी मतदान केले की नाही. आपल्या देशात चार खांब आहेत, पूर्वी ते दूरवर राहत असत, विकसित भारताचे छप्पर धरण्यासाठी हे चार खांब आवश्यक आहेत”, असं श्री श्री रविशंकर म्हणाले.

‘सर्व मिळून रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करू’, पीयूष गोयल यांचं आवाहन

“गुरुदेवांच्या आज चरणस्पर्शाचा योग आला. मला नेहमीच गुरुजींचे मार्गदर्शन लाभते. भारत नव्या युगात प्रवेश करत आहे. गेल्या 10 वर्षांत देशाची दिशा बदलली आहे. पंतप्रधानांनी देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन बदलण्याचा प्रयत्न केला आहे. आज जगभरात भारताकडे नव्या आदराने पाहिले जाते. आज आपण सर्वांनी आगामी काळात विकसित भारताचे राजदूत होण्याचा संकल्प केला आहे. आपण सर्वांनी मिळून पुन्हा एकदा देशाला सोन्याचा पक्षी बनवायचा आहे. प्रभू श्रीराम 500 वर्षांनंतर आपल्या घरी परतले आहेत. आपण सर्व मिळून ही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करू”, असं आवाहन पीयूष गोयल यांनी या कार्यक्रमात केलं.

सोनू निगम काय म्हणाला?

“मी पीयुषजींना चांगले ओळखतो. ते एक चांगले व्यक्ती आहेत. आमच्या पियुषजींना खूप खूप शुभेच्छा आहेत. देशातील जनतेने जे योग्य ते करावे. 10 वर्षांनंतर, मी अभिमानाने सांगू शकतो की, मी भारताचा एक भाग आहे ज्याचा मी एक भाग आहे”, असं सोनू निगम म्हणाला.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.