Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shambhuraje Desai: 50 कोटी दिले कोणी त्याचा आधी पुरावा द्या; राजकारण सोडून घरी बसतो; शंभूराजे देसाईंचा थेट संजय राऊतांवर हल्लाबोल

शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार 25 वर्ष टिकेल असं सांगितले होतं, पण अडीच वर्षात हे सरकार गेले. त्यानंतर आता शरद पवार सांगत आहेत की, मध्यावधी लागणार, पण तसं काही होणार नसल्याचेही असं शंभूराजे देसाई म्हणाले.

Shambhuraje Desai: 50 कोटी दिले कोणी त्याचा आधी पुरावा द्या; राजकारण सोडून घरी बसतो; शंभूराजे देसाईंचा थेट संजय राऊतांवर हल्लाबोल
शंभूराजे देसाईंची संजय राऊतांवर टीका
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 7:14 PM

मुंबईः बंडखोरी नाट्यानंतर आमदार एकनाथ शिंदे (Chief Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर हे बंडखोरी नाट्य संपले असले तरी त्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांचे नाट्य सुरू झाले. शिवसेनेतून संजय राऊत यांनी बंडखोर आमदार आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र केल्यानंतर आता बंडखोर आमदारांच्या गटातून जाहीररित्या टीका केल्या जाऊ लागल्या. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामुळेच शिवसेनेवर ही वेळ आली आहे. राऊत यांच्यामुळेच पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले 40 आमदार बाहेर पडले आहेत. त्यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही अशा शब्दात शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई (Rebel MLA Shambhuraje Desai) यांनी टीका केली आहे.

गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींनंतर शंभूराजे देसाई आज साताऱ्यात आले होते. त्यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत शरद पवार बोलतात ते कधीच खरं होत नसल्याचे सांगितले.

शरद पवार सांगतात मध्यावधी लागणार

यावेळी शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार 25 वर्ष टिकेल असं सांगितले होतं, पण अडीच वर्षात हे सरकार गेले. त्यानंतर आता शरद पवार सांगत आहेत की, मध्यावधी लागणार, पण तसं काही होणार नसल्याचेही असं शंभूराजे देसाई म्हणाले.

 प्रत्येक आमदाराला 50 कोटी दिल्याचा आरोप

बंडखोर आमदारांना मोठी रक्कम दिल्याची टीका होत असतानाच ते म्हणाले की, प्रत्येक आमदाराला 50 कोटी दिल्याचा आरोप केला जातो आहे, त्यावर बोलताना ते म्हणाले की, पैसे घेतल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून घरी बसेन, आम्ही शिवसेनेत आहोत, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंची शिवसेना पुढे घेऊन आम्ही चाललो असल्याचेही त्यांनी सांगितलं.

आमचा त्यांच्यावर विश्वास

यावेळी त्यांनी प्राप्त परिस्थितीच्या राजकारणावर बोलताना संजय राऊत यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सांगितले की, मैदान आता जास्त दूर नाही. अडीच वर्षानंतर निवडणुका होतील तेव्हा परिस्थिती समोर येईल. आमच्या नेत्याने एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही असा शब्द दिला आहे, आणि आमचा त्यांच्यावर विश्वास असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.