AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : टीव्ही 9 स्पेशल रिपोर्ट ! कांदा भिजला, भाजीपाला वाया, विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनात आक्रमक

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेत. तर याच मदतीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनात चांगेलच आक्रमक झाले होते.

Video : टीव्ही 9 स्पेशल रिपोर्ट ! कांदा भिजला, भाजीपाला वाया, विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनात आक्रमक
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 10:36 PM

मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं. पिकं अक्षरश: वाया गेलीत. त्यामुळं सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेत. तर याच मदतीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनात चांगेलच आक्रमक झालेत.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. हाताशी आलेलं पिक गेलं. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. हाच मुद्दा अधिवेशनात विरोधकांनी लावून धरला. पाऊस आणि गारपिटीमुळं गहू गेला. द्राक्षांची बागं भूईसपाट झाली. कांदा भिजला. भाजीपाला वाया गेला. सरकारनं पंचनाम्याचे आदेश दिलेत..पण जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी संपावर आहेत. तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी, नुकसानीची आकडेवारी आल्यावर मदत देणार असल्याचं म्हटलंय.

विखे पाटलांच्या याच उत्तरावर, पुन्हा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पंचनाम्याचा मुद्दा उपस्थित केला. संपावर असतानाही जे कर्मचारी पंचनामे करतायत, ते सहीच करत नसल्याचं अजित पवार म्हणाले. मग असं असेल तर पंचनामे ग्राह्य कसे धरणार ? आणि कधी मदत मिळणार? असा सवाल अजित पवारांनी केलाय.

सरकारनं मदतीचं आश्वासन दिलंय. त्यासाठी सरकारला पंचनाम्याची वाट आहे. त्यामुळं त्वरित सरकारी सोपस्कार पूर्ण करुन शेतकऱ्याला दिलासा द्यावा हीच अपेक्षा.

घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती.
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.