विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण? संजय राऊत यांनी स्पष्टपणे नावाच सांगितले

Sanjay Raut: लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागले आहे. सरकारकडून दिलेले पैसे कोणाच्या खिशातील पैसे नाही. त्यामुळे लोकांनी त्या पैशांचा लाभ घ्यावा. परंतु मतांसाठी निर्माण केलेली ही योजना बंद होणार आहे. काही दिवसांत सरकारच्या या सर्व योजना बंद करण्यात येतील.

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण? संजय राऊत यांनी स्पष्टपणे नावाच सांगितले
संजय राऊतImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 10:44 AM

राज्यात ऑक्टोंबर, नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नुकताच नवी दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्या भेटीत मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या. काँग्रेस निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यास तयार नसल्याचे वृत्त त्या दौऱ्यादरम्यान आले. परंतु आता शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पुढील मुख्यमंत्री कोण असणार? हे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर त्या सरकारकडून काय करण्यात येणार? त्याचीही माहिती दिली. आता निवडणुकीनंतर ठाकरे 2 सरकार येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. म्हणजेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असणार असल्याचे संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संजय राऊत यांनी 370 कलम रद्द करण्याचा फायदा केवळ भाजपला झाल्याची टीका केली. देशाला कलम 370 करण्याचा काहीच फायदा झाला नाही. काश्मिरात 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जवान शहीद होत आहेत. अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यात मोदी सरकारला यश आले नाही. नरेंद्र मोदी यांच्याकडे बहुमत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

धारावी प्रकल्पाची एक विट रचू देणार नाही

मुंबई शहरातील आणखी एक भूखंड अदानी यांना दिला आहे. कांजूरमार्ग येथील भूखंड दिला जात आहे. एकूण 22 बहुमूल्य भूखंड दिले महायुती सरकारकडून अदानी यांना दिले जात आहेत. हे सरकार तीन गँगचे सरकार आहे. पूर्वी लँड माफिया गुंडगिरी करत होते. आता सरकारचे लाडके उद्योगपती यांना भूखंड दिले जात आहे. शिवसेना या प्रकल्पाची एकही विट रुचू देणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी केला. मंत्रिमंडळ बैठकीत जे वाद होत आहेत. गँगवार पेटले आहे. हे सरकारमधील शिंदे आणि फडणवीस गँगमधील वाद आहेत.

हे सुद्धा वाचा

आताची लाडकी बहीण योजना बंद करणार…

लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागले आहे. सरकारकडून दिलेले पैसे कोणाच्या खिशातील पैसे नाही. त्यामुळे लोकांनी त्या पैशांचा लाभ घ्यावा. परंतु मतांसाठी निर्माण केलेली ही योजना बंद होणार आहे. काही दिवसांत सरकारच्या या सर्व योजना बंद करण्यात येतील. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर नव्या स्वरुपात या योजना अणणार आहे. ठाकरे 2 सरकार येणार आहे, असे संजय राऊत यानी म्हटले आहे.

पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.