AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinod Tawde : विनोद तावडेंचा वनवास संपला, त्रिपुराच्या निमित्ताने मोठी जबाबदारी, राज्यसभेवरही संधी मिळणार ?

महाराष्ट्रातील भाजप नेते विनोद तावडे यांची त्रिपुरामध्ये पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हेही या राजकीय घडामोडीतील एक वेगळेपण आहे. एवढेच नाही तर तावडे यांचं नाव राज्यसभेसाठीही आघाडीवर आहे. जुलै महिन्यात राज्यभेच्या काही जागांसाठी निवडणूक पार पडत आहे.

Vinod Tawde : विनोद तावडेंचा वनवास संपला, त्रिपुराच्या निमित्ताने मोठी जबाबदारी, राज्यसभेवरही संधी मिळणार ?
विनोद तावडेंचा वनवास संपला, त्रिपुराच्या निमित्ताने मोठी जबाबदारी, राज्यसभेवरही संधी मिळणार ?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 5:23 PM

मुंबई : आज राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच देशाच्या राजकारणातही खळबळ माजवणाऱ्या घटना घडत आहे. कारण त्रिपुराचे (Tripura) मुख्यमंत्री विप्लव देव (Biplab Kumar Deb resigns) यांनी राजीनामा दिला आहे. मात्र यात भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांचा वनपास संपला आहे. कारण महाराष्ट्रातील भाजप नेते विनोद तावडे यांची त्रिपुरामध्ये पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हेही या राजकीय घडामोडीतील एक वेगळेपण आहे. एवढेच नाही तर तावडे यांचं नाव राज्यसभेसाठीही आघाडीवर आहे. जुलै महिन्यात राज्यभेच्या काही जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. यात भाजपकडून विनोद तावडे आणि महिला नेत्या विजया राहटकर यांचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपासून सुरू असलेला विनोद तावडे यांचा वनवास आता संपला आहे.

तावडेंना राज्यसभेवर संधी?

विनोद तावडे यांनी राष्ट्रय राजकारणात पुन्हा एकदा दमदार कमबॅक केलं आहे. येत्या काही महिन्यात त्रिपुरात निवडणुका पार पडणार असल्यामुळे आता तावडे त्रिपुराची कमान कशी संभाळणार? याकडेही राजकीय नजरा लागल्या आहेत.भाजप नेते विनोद तावडे हे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपकडून त्यांना तिकीटही देण्यात आले नव्हते. त्यानंतर काही दिवस तावडे यांचे हात मोकळेच होते. त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात पक्षाची मोठी जबाबादारी त्यांच्याकडे देण्यात आली आणि आता आता त्यांच्यावर त्रिपुरात मोठी जबाबदारी सोपण्यात आली आहे, त्यामुळे तावडे राज्यसभेवर गेले तर आश्चर्य नको वाटायला. मात्र हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

त्रिपुरात नेमकं काय घडलं?

भाजपने गेल्या काही महिन्यात अनेक राज्याचे मुख्यमंत्री बदलले आहेत. त्रिपुरातही तेच घडलं आहे. मुख्यमंत्री विप्लव देव यांच्यावरील पक्षांतर्गत नाराजी आणि आमदारांची गळती थांबवण्यासाठी हा निर्णय भाजपने घेतला आहे. त्याचवेळी, बिप्लव यांच्या राजीनाम्यानंतर संध्याकाळी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठकही होणार असून, त्यात नव्या मुख्यमंत्र्यांबाबत चर्चा होऊ शकते. 2018 मध्ये बिप्लब देब मुख्यमंत्री झाले. त्रिपुरामध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी पक्ष मजबूत करण्यासाठी भाजपने राज्याची कमान नव्या चेहऱ्याकडे सोपवण्याचा पवित्रा घेतल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता त्रिपुराचा नवा मुख्यमंत्री कोण असणार आणि आगाडी निवडणुकीत भाजप हे राज्य पुन्हा जिंकणार की मुख्यमंत्री बदलाचे सत्र इथे महागात पडणार? हे आगामी निवडणुकीतील निकालच सांगतील.

हे सुद्धा वाचा

संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक!
संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक!.
पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त
पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त.
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?.
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान.
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी.
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.