AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MVA : त्या चार आमदारांचं कसं होणार, ज्यामुळे ठाकरे सरकारची अडचण होऊ शकते, कुणाला कोरोना तर कुणी जेलमध्ये, मतदान होणार?

महाविकास आघाडी सरकारमधील आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्री छगन भुजबळ यांना नुकताच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सधा तुरूंगात आहेत.

MVA : त्या चार आमदारांचं कसं होणार, ज्यामुळे ठाकरे सरकारची अडचण होऊ शकते, कुणाला कोरोना तर कुणी जेलमध्ये, मतदान होणार?
अजित पवार/छगन भुजबळ/अनिल देशमुख/नवाब मलिकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 9:30 PM

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उद्या मुंबईला येणार आहेत. उद्या बहुमत चाचणी होणार आहे. एकीकडे एकनाथ शिंदे आपल्यासोबत 50 आमदार असल्याचा दावा करत आहेत. त्यांच्या बंडखोरीमुळे आधीच महाविकास आघाडी सरकार संकटात आले असताना आणखी एक संकट महाविकास आघाडी सरकारसमोर (Mahavikas Aghadi Government) उभे राहिले आहे. महाविकास आघाडीमधील चार मंत्री मतदान करू शकतील का, हा सवाल उपस्थित होत असून सरकारसमोरची डोकेदुखी वाढली आहे. उद्या बहुमत चाचणी आहे. त्यात आघाडीच्या त्या चार मतांचे काय होणार, हा प्रश्न आहे. चार मतांमध्ये दोघांना कोरोना, तर दोघे तुरुंगात आहेत. आता हे चार आमदार मतदान कसे करू शकणार, याविषयी महाविकास आघाडीसमोर मोठे प्रश्नचिन्ह आहे. तर तिकडे भाजपाचा (Maharashtra BJP) आत्मविश्वास वाढलेला दिसून येत आहे.

‘कोरोना अन् जेल’ने वाढवली डोकेदुखी

महाविकास आघाडी सरकारमधील आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्री छगन भुजबळ यांना नुकताच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सधा तुरूंगात आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बहुमत चाचणीत हे चार मंत्री मतदान करू शकतील का, ठाकरे सरकार अडचणीत येणार का, बहुमत चाचणीत महाविकास आघाडीची सरशी होणार, ही शिंदे गटाच्या सहकार्याने भाजपा आपल्या कारस्थानांमध्ये यशस्वी होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेची कोर्टात धाव, यश येणार?

बहुमत चाचणी उद्या म्हणजेच 30 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. ही प्रक्रिया संध्याकाळी 5 वाजपर्यंत चालणार आहे. राज्यपालांच्या निर्णयाला स्थगिती मिळावी, म्हणून शिवसेना पक्षाने कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या बाजूने निर्णय येतो, की आघाडीला बहुमत सिद्ध करावे लागते, हे पाहावे लागणार आहे. बहुमत सिद्ध करावे लागलेच तर महाविकास आघाडीला चार मतांचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या 39 आमदारांनी आघाडीतून बाहेर पडण्याची निर्वाणीची भाषा केली आहे. सात अपक्ष आमदारांनी पत्र लिहून सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे आधीच जाहीर केले आहे.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.