AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाच्या उमेदवारावर काँग्रेस नेत्याचा आक्षेप, नेमकं कारण काय?

ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. पण त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी विरोध केला आहे. आपण अमोल कीर्तिकर यांचं काम करणार नाही, असं थेट निरुपम म्हणाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा आहे. निरुपम स्वत: या जागेवर लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी माध्यमांसमोर आपला अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीला नेमका विरोध का आहे? याबाबत मुद्देसूद प्रतिक्रिया दिलीय.

ठाकरे गटाच्या उमेदवारावर काँग्रेस नेत्याचा आक्षेप, नेमकं कारण काय?
संजय निरुपम यांचा अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीला विरोध
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 4:32 PM

ठाकरे गटाकडून आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 16 उमेदवारांची नावे आहेत. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ठाकरे गटाकडून 17 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर लगेच महाविकास आघाडीत मतभेद समोर येताना दिसत आहेत. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. उत्तर पश्चिम मुंबई या जागेसाठी ठाकरे गटाकडून जाहीर झालेल्या उमेदवारावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.

सांगलीची जागा ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना जाहीर करण्यात आली आहे. पण या जागेवर काँग्रेसचा दावा आहे. तसा हा मतदारसंघ काँग्रेसला बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी, असा काँग्रेसचा दावा आहे. विशेष म्हणजे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीत गेले आहेत. त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेत आपलं म्हणणं मांडलं देखील आहे. तर दुसरीकडे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उघडपणे भूमिका मांडली आहे.

संजय निरुपम यांचा अमोल कीर्तिकर यांना विरोध का?

ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीला संजय निरोपम यांनी उघडपणे विरोध केला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ हा परंपरेने काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ असल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये गजानन कीर्तिकर यांनी जरी पराभव केला असला तरी पराभवानंतर आपण या लोकसभा मतदारसंघांमध्ये मागील पाच वर्षे काम केलं आहे. आपण या मतदारसंघात लोकसभेची तयारी जोमाने केली असल्याचं संजय निरूपम यांचं म्हणणं आहे.

हे सुद्धा वाचा

संजय निरुपम यांचा आक्षेप नेमका काय?

शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेले उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्यावर कथित खिचडी घोटाळा प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे. तरीही अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा मोठा मतदार असून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला हा मतदार पाठिंबा देऊ शकत नाही, असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे. अमोल कीर्तिकर यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारे निवडणुकीचा अनुभव नसताना त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणे हे योग्य नसल्याचं निरुपम यांचं मत आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.