AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत भायखळा फायर ब्रिगेडवर परिक्षार्थींची गर्दी, निवड करताना अन्याय झाल्याचा आरोप

मुंबईत भायखळा स्थित अग्निशमन दलाच्या मुख्यालयाबाहेर आज वेगळाच प्रकार बघायला मिळाला. काही तरुणांनी आज अग्निशमन दलाच्या मुख्यालय परिसरात चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या तरुणांनी अग्निशमन दलावर गंभीर आरोप केले आहत.

मुंबईत भायखळा फायर ब्रिगेडवर परिक्षार्थींची गर्दी, निवड करताना अन्याय झाल्याचा आरोप
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 7:36 PM

मुंबई : सध्याच्या घडीला नोकरी मिळवणं फार कठीण होऊन बसलं आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी मिळवणं हे फार जोखमीचं काम होऊन बसलं आहे. कारण पोलीस भरती, अग्निशमन दलाची भरती, आरोग्य खात्यांच्या भरती, शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील सरळ सेवा भरती अशा वेगवेगळ्या भरतींसाठी लाखो तरुण अर्ज करतात. ते नियमानुसार परीक्षा देतात. या परीक्षांचे निकाल खूप अटीतटीचे लागतात. जवळपास सर्वांनाच चांगले गुण मिळतात. पण शेवटी मेरीटच्या हिशोबाने निर्णय घ्यावा लागतो. संबंधित विभागाची परीक्षा आयोजित करणारी यंत्रणा याबाबतचा निर्णय घेत असते. पण सरकारी नोकरीसाठी इतकी स्पर्धा सुरु असताना मुंबईत अग्निशमन दलाच्या भरतीत मोठा घोळ झाल्याचा आरोप करण्यात येतोय.

मुंबई स्थित भायखळा फायर ब्रिगेड मुख्यालयाच्या परिसरात आज चांगलाच गोंधळ उडाला. अनेक तरुणांकडून गंभीर आरोप करण्यात आले. हा गोंधळ उडण्यामागील कारण म्हणजे फायर ब्रिगेडच्या भरतीसाठी नुकतीच पार पडलेली परीक्षा. या परीक्षेचा निकाल समोर आलाय. पण या निकालानंतर उमेदवारांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. आपल्याला जास्त गुण मिळूनही कमी गुण मिळवलेल्या तरुणाचं नाव निवड केलेल्या उमेदवारांच्या यादीत असल्याचा आरोप काही तरुणांनी केलाय. तर काहींनी या परीक्षेच्या निवड प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई स्थित भायखळा फायर ब्रिगेड मुख्यालयाच्या परिसरात आज उमेदवारांची गर्दी जमली. यात जमलेल्यांपैकी अनेकांनी अग्निशमन दलात भर्ती होण्यासाठी परिक्षा दिली होती. यावेळी अनेक उमेदवारांनी अग्निशमन दलाच्या भरतीत ‌घोटाळा झाल्याचा आरोप करत गंभीर आरोप केले. एकाच‌ उमेदवाराची चार वेळा निवड यादीत नावे दिसून येत आहेत, असा काहींचा आरोप आहे. तर काहींनी आपल्याला जास्त गुण मिळूनही आपल्या पेक्षा कमी गुण मिळालेल्यांची नावे यादीत आली आहे, असा आरोप केला. याशिवाय असे अनेक आरोप करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

यावेळी उमेदवारांनी चांगलाच गोंधळ घातला. अर्थात उमेदवारांचे आरोप खरे आहेत की खोटे आहेत? याबाबतची सविस्तर माहिती आगामी काळत समोर येईलच. पण ते आक्रमक होण्यामागील कारण महत्त्वाचं आहे. प्रत्येक उमेदवाराला आजच्या घडीला नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे. नोकरीसाठी तरुण वणवण फिरत आहेत. अनेक जण शेकडो किलोमीटर लांबून भरतीसाठी मुंबईत दाखल होतात. त्यामुळे या तरुणांची व्यथा समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. दरम्यान, तरुणांनी केलेल्या गंभीर आरोपांवर अग्निशन दलाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

अग्निशमन दलाचे प्रमुख संजय मांजरेकर यांच्याकडून महत्त्वाचं आश्वासन

या प्रकरणावर अग्निशमन दलाचे प्रमुख संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही याबाबत जी काही तक्रार आली आहे त्याची सखोल चौकशी करत आहोत. आम्ही उमेदवारांच्या प्रत्येक आरोपांची चौकशी करू. मात्र काहीच चुकीचं होणार नाही. कुणासोबतही अन्याय होणार नाही याची दखल आम्ही घेऊ”, असं आश्वासन अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी दिलं.

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.