AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Roads | नागपूर जिल्ह्यामध्ये 575 पांदण रस्त्यांना मंजुरी; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गावाच्या विकासाच्या दृष्टिकोणातून पांदण रस्ते महत्वाचे असतात. अशा 575 पांदण रस्त्यांना जिल्हा प्रशासनानं मंजुरी दिली आहे. या कामांमधून गावाचा विकास होणार आहे. त्यामुळं पावसाळ्यापूर्वी हे रस्ते तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.

Nagpur Roads | नागपूर जिल्ह्यामध्ये 575 पांदण रस्त्यांना मंजुरी; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 5:00 AM

नागपूर : शेतीमध्ये मनुष्यबळाच्या कमी उपलब्धतेमुळे तसेच यांत्रिकीकरणामुळे थेट शेतापर्यंत रस्ते आवश्यक झाले आहेत. यासाठी राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पांदण रस्त्याच्या कामाला जिल्ह्यामध्ये प्राधान्य देण्यात येत आहे. या विकास कामात गावागावांत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला (Collector R. Vimala) यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये (Collector Office) झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर (Chief Executive Officer Yogesh Kumbhejkar) व संबंधित विभागांचे अभियंते, विभाग प्रमुख उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यामध्ये 575 पांदण रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये भिवापूर, हिंगणा, कळमेश्वर, कामठी, काटोल, कुही, मौदा, नागपूर, नरखेड, पारशिवनी, रामटेक, सावनेर, उमरेड, या तेरा तालुक्यांतील 575 मंजूर कामांना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

पांदण रस्ते गावातील

गावाच्या विकासाच्या दृष्टिकोणातून पांदण रस्ते महत्वाचे असतात. अशा सुमारे पाचशे पांदण रस्त्यांना जिल्हा प्रशासनानं मंजुरी दिली आहे. या कामांमधून गावाचा विकास होणार आहे. त्यामुळं पावसाळ्यापूर्वी हे रस्ते तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. पांदण रस्ते मुख्यत्वे गावातील रस्ते आहेत. यामुळे सर्वांचा फायदा होणार आहे. त्यामुळे रस्त्यांचे काम होत असताना व्यापक जनहित लक्षात घेऊन गावकऱ्यांनी या कामात सहकार्य करावे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

शासनाची महत्त्वाकांशी योजना

या रस्त्यांसाठी ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व वन विभाग काम करीत आहे. या चारही विभागाच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी गतीने ही कामे पूर्ण करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहे. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध. योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेत रस्ते सुद्धा महामार्गा एवढेच महत्त्वाचे आहेत. राज्य शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी गावातील लोकांनी या पांदण रस्त्याच्या निर्माणाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

हे सुद्धा वाचा

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.