AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंडल आंदोलनात ओबीसी नव्हतेच, भाजपने राजकारण करू नये; बबनराव तायवाडे यांनी केलं आव्हाडांचं समर्थन

मंडल आयोगाच्या आंदोलनात ओबीसी नव्हते हे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं विधान बरोबरच आहे. त्यामुळे भाजपने विनाकारण त्याचं राजकारण करू नये.

मंडल आंदोलनात ओबीसी नव्हतेच, भाजपने राजकारण करू नये; बबनराव तायवाडे यांनी केलं आव्हाडांचं समर्थन
babanrao taywade
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 10:24 AM

नागपूर: मंडल आयोगाच्या आंदोलनात ओबीसी नव्हते हे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं विधान बरोबरच आहे. त्यामुळे भाजपने विनाकारण त्याचं राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली आहे.

बबनराव तायवाडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. मंडल आयोगाच्या आंदोलनात ओबीसी समाज नव्हता. आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य वास्तवाला धरुन आहे. भाजप यावर राजकारण करत आहे, असं सांगतानाच आव्हाड यांच्याप्रमाणे इतरंही ओबीसी नेत्यांनी ओबीसी समाजाला जागृत करावं. 60 टक्के ओबीसी समाज जागृत झाल्यास तो सत्ताधारी असेल, असं तायवाडे म्हणाले.

तेव्हा ओबीसी मागे होते

ठाण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी ओबीसी समाजाने लढायला हवे होते. पण, त्यावेळेस मैदानात दलित वर्ग उतरला होता. ओबीसी मात्र मागे होते. कारण, त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा पगडा आहे. पण, आता आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना मैदानात उतरावेच लागेल, असे आवाहन आव्हाड यांनी केले होते.

बाबासाहेबांच्या राजीनाम्याची जाणीव ठेवा

जोतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले जर नसते तर आज इथे कोणतीच महिला दिसली नसती. महिला कोणत्याही जातीधर्माची असली तरी ती सुशिक्षित झाली त्याचे श्रेय फक्त आणि फक्त सावित्रीमाई यांनाच जाते. कार्ल मार्क्स याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ जर कोणी असेल तर ते जोतिराव फुलेच आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा ओबीसींसाठीच दिला आहे, याची जाणीव तमाम ओबीसींनी ठेवले पाहिजेत. आज ओबीसींचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न होत आहे. पण, हे आरक्षण संपवणार्या केंद्राविरोधात ओबीसी आक्रमक होत नाहीत. आता लढण्याची वेळ आली आहे. पांगळे होऊ नका, लढा, असे आवाहनही त्यांनी यावेळेस केले.

ओबीसी एकवटू लागले आहेत, हे अत्यंत चांगले आहे. पण, राज्याने इम्पिरिकल डाटा सादर करून ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले होते. तर, ओबीसी नेतृत्व अशोक वैती यांनी , एका कार्यक्रमापुरते मर्यादित राहू नये, ठाणे ओबीसी एकीकरण समितीने यापुढेही नियमित एकत्र येणे गरजेचे आहे. जर आपण एकत्र आलो तरच ओबीसींची बिगर राजकीय ताकद उभी राहिल, असे सांगितले.

संबंधित बातम्या:

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्यावर मुंबई पालिका मेहरबान, प्रतीक्षा बंगल्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ, लोकायुक्तांनी फटकारलं

Uday Samant : कोरोना रुग्णांमध्ये वाढ, विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद? आज फैसला; उदय सामंत यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

Dockyard Road Station Attack | स्टेशनवर महिलेचा गळा चिरण्याचा प्रयत्न, रेल्वे अधिकाऱ्यामुळे बचावले प्राण

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.