AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur NCP | नागपुरात महाविकास आघाडीत बिघाडी!; मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा?

नागपुरात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिली. नागपूर महापालिका निवडणूक तयारी म्हणून नुक्कड सभा सुरू असल्याचं ते म्हणालेत.

Nagpur NCP | नागपुरात महाविकास आघाडीत बिघाडी!; मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा?
नागपूर महापालिका
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 4:15 PM

नागपूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीत (Mahavikas lead in elections) बिघाडी होत असल्याचं चित्र आहे. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला. आता राष्ट्रवादीनेही नागपुरात स्वबळाच्या दिशेनं तयारी सुरु केलीय. शहरातील 52 प्रभागात 156 जागांवर राष्ट्रवादीने तयारी सुरु (The NCP started preparations)केलीय. यासाठी नुक्कड सभा सुरू केल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे (NCP’s city president Duneshwar Pethe) यांनी दिली. ॲाफर आल्यास शिवसेनेचा विचार करु, असंही ते म्हणाले. निवडणुकीसाठी सारे पक्ष सक्रिय झाले आहेत. भाजपने सर्व्हेवर भर दिला. अंतर्गत आणि बाह्य सर्व्हेचा रिपोर्ट आल्यानंतर उमेदवारी जाहीर केली जाईल. तोपर्यंत नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे. पुन्हा तिकीट मिळते की, नाही, या चिंतेने भाजपचे नगरसेवक ग्रासले आहेत. समजा तिकीट मिळाली नाही. तर अपक्ष राहायचे, दुसऱ्या पक्षाला उमेदवारी मागायचे की, शांतपणे पक्षाचेचं काम करायचे यावर त्यांचे चिंतन सुरू आहे.

राष्ट्रवादी नागपुरातून कशी संपणार?

महाआघाडीत कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भातून राष्ट्रवादी संपविण्याचे बोलून दाखवितात. याचा राग राष्ट्रवादीला अद्याप आहे. त्यामुळं राष्ट्रवादी हे काँग्रेसच्या मागेमागे जाण्यास तयार नाही. राष्ट्रवादीचे प्रमुख शहरातील प्रमुख नेते अनिल देशमुख सध्या कैदेत आहेत. त्यामुळं आता राष्ट्रवादीची धुरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांभाळली. पटेल यांनी मध्यंतरी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी ठेवा, असं म्हटलं होतं. त्यामुळं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता स्वबळाची भाषा बोलत आहेत. आम्ही नुक्कड बैठकांवर भर देत असल्याचं दुनेश्वर पेठे यांनी सांगितलं. तिकडे काँग्रेसनेही एकला चलो रे सुरू केलंय. त्यामुळं राष्ट्रवादीलाही दुसरा पर्याय नाही. शिवसेनेचे चित्र मात्र वेगळे आहे. नव्यानं पक्षात आलेल्यांवर जुने कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळं नागपुरात शिवसेनेचे कार्यकर्ते दुभंगले गेले असल्याच चित्र आहे. नेतृत्व कोण करणार यावरून वाद आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादीचे नेतृत्त्व दुनेश्वर पेठे यांनी घेतले. ते स्वतः नगरसेवक आहेत. स्वतःची जागा वाचविणे आणि पक्षातील इतरांना मदत करणे, अशी दुहेरी भूमिका त्यांना पार पाडावी लागणार आहे.

Nagpur Crime | पत्नी सोडून जाईल या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न; नागपुरात नेमकं काय घडलं?

यवतमाळ – वणी पोलिसांवर मोठी कारवाई, चार पोलीस निलंबित; ठाणेदाराला अभय का?, काय आहे प्रकरण?

हिंगणघाटातील अंकिता जळीतकांडाचा निकाल आता नऊ फेब्रुवारीला; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती

'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.