AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आजच्या परिस्थितीत सावरकर हा राष्ट्रीय इश्यू नाही”; शरद पवार यांनी भाजपच्या राजकारणावर स्पष्टच सांगितलं…

विरोधकांची मोट बांधण्याचं काम जरी सुरू असलं तरी, ते अजून चर्चात्मक पातळीवरच सुरु आहे. मात्र अजूनही त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

आजच्या परिस्थितीत सावरकर हा राष्ट्रीय इश्यू नाही; शरद पवार यांनी भाजपच्या राजकारणावर स्पष्टच सांगितलं...
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 6:40 PM

नागपूर : भाजपचे नेते आणि मंत्री नितिन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितिन गडकरी यांच्या भेट झाल्यानंतर शरद पवार यांची पत्रकार परिषदही झाली. शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील शेतीच्या प्रश्नांबरोबरच राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून चाललेल्या राजकारणाव महत्वपूर्ण भाष्य केले आहे. यावेळी शरद पवार यांना राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी तुम्ही आणि राहुल गांधी सावरकर या विषयावर कधी काय बोलला होता का यावर बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज्यातील आणि देशातील अनेक महत्वाचे आणि गंभीर प्रश्न आहेत.

त्याविषयी आमच्यामध्ये चर्चा होते, आणि झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत अनेक प्रश्न आहेत, मात्र सावरकर हा राष्ट्रीय इश्शू नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सुरु करण्याचे फायदे सांगताना शरद पवार यांनी सांगितले की, विदर्भातील आणि खान्देशातील शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. मराठवाड, विदर्भ या भागात ज्या प्रकारे सोयाबीन पिकवले जाते त्याच प्रमाणे जर ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली तर त्याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना प्रचंड होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शरद पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातील शेतीविषयी आगामी काळात काय प्रयोग करता येतील. आणि त्याचा फायदा या शेतकऱ्यांना कसा होणार हेही त्यांनी यावेळी सांगितले. देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी बोलताना सांगितले की, भाजपचे मिशन 400 हा प्रयोग माझ्या गावातून म्हणजे बारामतीतून चालू होत आहे.

याचा मला अभिमान आहे. त्यावर विरोधकांकडून असा काही प्रयोग चालू आहे का असा सवाल उपस्थित केला असता त्यांनी सांगितले की, प्रयोग चालू नसला तरी, त्याबाबत विचार विनिमय चालू आहे. मात्र असं भाजपसारखं आम्ही अजून काही जाहीर केलं नसल्याचेही त्यांनी सांगितले.

विरोधकांची मोट बांधण्याचं काम जरी सुरू असलं तरी, ते अजून चर्चात्मक पातळीवरच सुरु आहे. मात्र अजूनही त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर संभाजीनगरमधील राड्याविषयी बोलताना सांगितले की, अशी जर सामाजिक परिस्थिती झाली असेल तर राजकीय आणि जाणकार व्यक्तिंनी त्यावर सामंजस्याची भूमिका घेऊन अशा सामाजिक परिस्थितीची काळजी घ्यावी असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.