AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्बंध शिथील तरीही नागपूरचे व्यापारी आक्रमक, व्यापाऱ्यांना नेमकी कशाची भीती?

राज्य सरकारनं गेल्या आठवड्यामध्ये दुकानांच्या वेळा वाढवण्यास मंजुरी दिली. मात्र, उद्यापासून कोरोना लसीच्या दोन डोसची अट राज्य सरकारनं ठेवलीय. यामुळं इन्स्पेक्टर राज वाढेल, त्यामुळं ही अट शिथील करावी, अशी मागणी नागपुरातील व्यापारी करत आहेत.

निर्बंध शिथील तरीही नागपूरचे व्यापारी आक्रमक, व्यापाऱ्यांना नेमकी कशाची भीती?
नागपूर व्यापारी
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 3:40 PM

नागपूर: राज्य सरकारनं गेल्या आठवड्यामध्ये दुकानांच्या वेळा वाढवण्यास मंजुरी दिली. मात्र, उद्यापासून कोरोना लसीच्या दोन डोसची अट राज्य सरकारनं ठेवलीय. यामुळं इन्स्पेक्टर राज वाढेल, त्यामुळं ही अट शिथील करावी, अशी मागणी नागपुरातील सरकार जगाव वाणिज्य बचाव संघर्ष समितीने केलीय.

कोरोना लसीकरणाची अट शिथील करावी

कोरोना लसीचा तुटवडा असल्याने सर्वांना दोन डोस घेणं शक्य नाही, त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी दोन डोसची ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी असलेली अट शिथील करावी. उद्यापासून लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही सर्व ठिकाणी प्रवेश द्यावा, अशी मागणी करण्यात आलीय. तसंच संकटात असलेल्या व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेज देण्याची मागणीही व्यापारी संघर्ष समितीचे प्रमुख दिपेन अग्रवाल यांनी केलीय.

लसीचा एक डोस घेतलेल्यांना परवानगी द्या

सध्या कोरोना लसींचा तुटवडा आहे. लस उपलब्ध होत नसल्यानं आणि लसींच्या दोन्ही डोसमधील अंतर पाहता दोन्ही डोस घेण्यासाठी तीन महिने लागू शकतात. त्यामुळे लसीकरणाची अट शिथील करत कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्यांना परवानगी द्यावी, असं दिपेन अग्रवाल यांनी म्हटलंय. सरकार एका बाजूनं दुकानं उघडण्यास परवानगी देतेय मात्र, दुसऱ्याबाजूनं नियम करुन त्या निर्णयात अडथळे निर्माण करत आहे, असं अग्रवाल यांनी सांगितलंय.

व्यापाऱ्यांना मदत करावी

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात दुकानं बंद असल्यानं छोट्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं यंत्रणा तयार करुन व्यापाऱ्यांना पॅकेज द्यावं, असं दिपेन अग्रवाल म्हणाले. लॉकडाऊनमुळे छोटे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.

निर्णयाला उशीर पण स्वागत

दुकानं उघडण्याबाबतचा निर्णय उशिरा झाला आहे. दुकानं सुरु करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव यांचं या निर्णयाबद्दल अभिनंदरन करतो, असं अग्रवाल म्हणाले.

विदर्भाची कोरोनामुक्तीकडं वाटचाल

विदर्भातील 11 ही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे विदर्भवासियांना मोठा दिलासा मिळाला. विदर्भात गेल्या चार दिवसांत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. इतकंच नाही तर रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. विदर्भाचा पॉझिटिव्हिटी रेट 0.30 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. चांगल्या उपाययोजनांमुळे रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहोचला आहे.

विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये गेल्या चार दिवसांत करोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर विदर्भात गेल्या 24 तासांत 14 हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

इतर बातम्या:

चांगली बातमी : लवकरच लहान मुलांची स्वदेशी लस येणार, ‘या’ महिन्यापर्यंत मुलांसाठी लस उपलब्ध?

Nagpur corona : नागपूरची कोरोनामुक्तीच्या दिशेने घोडदौड, 9 दिवसात शून्य मृत्यू

Nagpur Traders demanded govt should be cancel fully vaccinated norm due to lack of corona vaccine supply

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.