AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: ओबीसींच्या 36 वसतिगृहांचं काय झालं?; ओबीसी महासंघाचा पटोले, वडेट्टीवारांना सवाल

ओबीसींच्या वसतिगृहाच्या मुद्द्यावरून ओबीसी महासंघाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ( OBC Reservation)

VIDEO: ओबीसींच्या 36 वसतिगृहांचं काय झालं?; ओबीसी महासंघाचा पटोले, वडेट्टीवारांना सवाल
babanrao taywade
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 10:58 AM

नागपूर: ओबीसींच्या वसतिगृहाच्या मुद्द्यावरून ओबीसी महासंघाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 वसतिगृह बांधण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. तीन वर्षे झाली. या आश्वासनाचं काय झालं? असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केला आहे. (rashtriya obc mahasangh slams maha vikas aghadi over obc hostels)

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी हा सवाल केला. ओबीसी समाजाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन आहे. 2018 मध्ये ओबीसींसाठी 36 वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार, नाना पटोलेंनी यांनी या वसतिगृहाची घोषणा केली होती. मात्र, तीन वर्षे होत आले तरी वसतिगृहासाठी काहीच हालचाली झालेल्या नाहीत. वसतिगृहाची घोषणा हवेतच विरली आहे. या आश्वासनाचं काय झालं?, असा सवाल तायवाडे यांनी केला आहे.

मराठा समाजाचे वसतिगृह होते, ओबीसींचे का नाही?

ओबीसी विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यांच्यासाठी वसतिगृह निर्माण झाले पाहिजे. एका महिन्यात ओबीसींचे वसतिगृह बांधण्यास सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तायवाडे यांनी दिला आहे. राज्य सरकार ओबीसींच्या बाबतीत फक्त आश्वासनं देतं. काम काही करत नाही. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह तयार झालेत, मग ओबीसींचे का नाही?, असा सवालही त्यांनी केला.

दोन वर्षात ओबीसी हिताचा निर्णय नाही

महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत ओबीसी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. दोन वर्षांत ओबीसी समाजाला सरकारकडून काहीही मिळालं नाही, वसतिगृहाचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय केवळ कागदावरच राहिला आहे, असं ते म्हणाले. (rashtriya obc mahasangh slams maha vikas aghadi over obc hostels)

संबंधित बातम्या:

‘आम्हाला सांगा, 4 महिन्यात इम्पिरिकल डाटा तयार करुन ओबीसी आरक्षण पूर्ववत करु, नाही तर पदावर राहणार नाही’, फडणवीसांचं जाहीर चॅलेंज

ठाकरेंच्या उमेदवाराच्या मनगटावर फडणवीसांचे नाव, ‘नरेंद्र’ यांच्या हातावर ‘देवेन्द्र’ टॅटू

VIDEO: शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण; पुन्हा चर्चेचं गुऱ्हाळ सुरू

(rashtriya obc mahasangh slams maha vikas aghadi over obc hostels)

एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.