‘दररोज शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन…’, उद्धव ठाकरे यांचा कुणावर निशाणा?

उद्धव ठाकरे यांनी रामटेकमध्ये आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. यासोबतच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.

'दररोज शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन...', उद्धव ठाकरे यांचा कुणावर निशाणा?
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 8:49 PM

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “शिवाजी महाराजांनी सुल्तानी संकट रोखलं. म्हणून हे दिल्लीवाले पाहत आहे. आज दिल्लीवाले पाहत आहे. त्यांना महाराष्ट्रातील जनता कमकुवत वाटते की काय. तुमच्या साक्षीने सांगतो, मोदी आणि शहा यांना सांगतो तुमची भीक नको. हक्काचं पाहिजे. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. आम्ही हक्काचं मागत आहोत. आम्हाला फुकटचं काही नको. त्यांना वाटतं मी म्हणजे कोणी तरी आहे. दररोज शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभे राहतात”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “ही वेळ येऊ देणार नाही. मिंधे म्हणजे महाराष्ट्र नाही. गुलाबी जॅकेटवाले महाराष्ट्र नाही. ही जनता महाराष्ट्र आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“लाडकी बहीण योजना. तुमच्या खिशातील पैसे देत नाही. माझ्या जनतेच्या खिशातील पैसे देत नाही. मी शेतकऱ्यांची कर्ज माफी केली. पण कधी एक कार्यक्रम घेऊन पैसे देत असल्याचं म्हटलं नाही. कर्जमुक्ती मेळावे घेतले नाही. कारण मी तुमच्या हक्काचं तुम्हाला दिलं. आमच्याकडे आज काही नाही. तुम्ही आमचा पक्ष आणि निशाणीही चोरली आहे. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला लावता. मी तुम्हाला १५०० रुपयेही देत नाही. तरीही तुम्ही आला. तुम्हाला पैसे दिले नाही, नाश्ता दिला नाही. तरीही तुम्ही आला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मी तुम्हाला वचन देतो…’

“उद्धव ठाकरे म्हणजे माणूस नाही तर शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. मी तुम्हाला वचन देतो. हे सरकार उलथवून टाकायचंच. उलथवून टाकायचंच. मला निसटता विजय नको. दणदणती विजय हवा. नागपूरमधील त्या व्यक्तीला पाडायचं आहे. सरकार आल्यावर पहिल्याप्रथम महाराष्ट्राची लूट थांबवून दाखवेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“मी मुख्यमंत्री असताना एक तरी उद्योग बाहेर गेल्याची बातमी आली का? मिंधे झाल्यावर कशी आली? त्यांना शिवसेना रोखायची आहे. कारण त्यांच्या महाराष्ट्र लुटीच्या आड शिवसेना आहे. पवार आहेत, काँग्रेस आहे. ही स्वाभिमानाची लढाई आहे. रामटेकच्या सहाच्या सहाही जागा आल्याच पाहिजे. उमेदवार शिवसेनेचा असो राष्ट्रवादीचा असेल किंवा काँग्रेसचा असेल. तुम्ही मला सहाहीच्या सहाही जागा निवडून देण्याचं वचन दिलं पाहिजे. मला वचन द्या”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार.
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?.
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?.
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला.
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?.
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका.
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर..
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर...
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी.
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका.