AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भात पावसाआधीच शेतकऱ्यांची धांदल; नंदूरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी गडबड करू नका; कृषी विभागाचे आवाहन

नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा हजारपेक्षा अधिक हेक्टर सोयाबीनचे पेरणी केली जात असते. सोयाबीन पेरणीसाठी स्व: उत्पादीत चांगले बियाणे पेरणीसाठी वापरावेत. पेरणीसाठी प्रती हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीचा किंवा प्लांटरचा वापर करावा.

विदर्भात पावसाआधीच शेतकऱ्यांची धांदल; नंदूरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी गडबड करू नका; कृषी विभागाचे आवाहन
कापूस पीक
Updated on: Jun 09, 2022 | 4:17 PM
Share

नागपूरः विदर्भात मान्सून (Vidharbh Monsoon) दाखल होण्यास अजून वेळ असला तरी शेतकऱ्यांची मात्र बियाणे खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी बियाणे खरेदीसाठी कृषी उद्योग दुकानात मोठी गर्दी करताना दिसत आहेत. ज्याप्रमाणे बियाने खरेदीला (Seed purchase) सुरुवात झाली, त्यावरून यावर्षी विदर्भात कापसाचा पेरा (Cotton seeds) वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळाला होता, त्यामुळे शेतकरी कापसाकडे वळताना दिसत आहे. विदर्भ हा कापसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे मात्र मागील काही वर्षात कापसाला मिळत असलेला कमी भाव आणि त्यासाठी लागणारा खर्च बघता शेतकऱ्यांच्या जास्त नुकसानच येत आहे.

त्यामुळे शेतकरी कापसापासून दूर जाताना दिसून येत होता, मात्र यावर्षी ज्या प्रमाणे खरेदी होत आहे त्यावरुन तरी असे दिसून येते की विदर्भात कापसाला पुन्हा चांगले दिवस येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी घाई करू नये

नंदूरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सोयाबीन पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पेरणी करण्यास सुरुवात करत आहे. मात्र जोपर्यंत पाऊस 75 ते 100 मि.मि झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.

चांगले बियाणे पेरणीसाठी वापरा

नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा हजारपेक्षा अधिक हेक्टर सोयाबीनचे पेरणी केली जात असते. सोयाबीन पेरणीसाठी स्व: उत्पादीत चांगले बियाणे पेरणीसाठी वापरावेत. पेरणीसाठी प्रती हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीचा किंवा प्लांटरचा वापर करावा.

कृषी विभागाकडून आवाहन

सोयाबिनची उगवण क्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रती 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवावे आणि नंतर बियाण्याची 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे.

आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार?
आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार?.
5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची राज्यपालांकडे लिस्ट अन्
5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची राज्यपालांकडे लिस्ट अन्.
अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल
अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल.
45 खासदार गप्प बसले, पण..; राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र
45 खासदार गप्प बसले, पण..; राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र.
पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान
पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान.
ये पब्लिक है...सब जानती है...पलटी मारली म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला
ये पब्लिक है...सब जानती है...पलटी मारली म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे 20 मिनिटं; भावांमध्ये काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे 20 मिनिटं; भावांमध्ये काय झाली चर्चा?.
सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी; रोहित पवारांचे नवे आरोप
सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी; रोहित पवारांचे नवे आरोप.
बोट दुर्घटना प्रकरण; 3 बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह सापडले
बोट दुर्घटना प्रकरण; 3 बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह सापडले.
विनाअट शस्त्रसंधी स्वीकारण्याचं कारण काय? अरविंद सावंतांचा थेट सवाल
विनाअट शस्त्रसंधी स्वीकारण्याचं कारण काय? अरविंद सावंतांचा थेट सवाल.