AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात समान नागरी कायदा आल्यास स्वातंत्र्य संपेल; बकरी ईदच्या दिवशी MIM च्या आमदाराचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

MIM MLA Mufti Ismail on Uniform Civil code : समान नागरी कायदा देश हिताचा नाही, तो लागू करू नये; MIM च्या आमदाराची केंद्र सरकारकडे मागणी

देशात समान नागरी कायदा आल्यास स्वातंत्र्य संपेल; बकरी ईदच्या दिवशी MIM च्या आमदाराचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 2:04 PM

मालेगाव, नाशिक : आज बकरी ईद आहे. सगळीकडे ईदचा उत्साह पाहायला मिळतो आहे. ठिकठिकाणी नमाज अदा केली जात आहे. एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी ईदच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच सोबत टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर घणाघात केलाय. समान नागरी कायद्यावरून मुफ्ती इस्माईल यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय.

समान नागरिक कायदा देश हिताचा नाही. भारतात 839 पर्सनल लॉ आहेत. जे बदलू शकत नाहीत. कुणा कुणाचा कायदा बदलणार आहात? असा सवाल मुफ्ती इस्माईल यांनी विचारला आहे.

मालेगावमध्ये नमाज पठण

बकरी ईदनिमित्त नाशिकच्या मालेगावमध्ये नमाज अदा करण्यात आली. नाशिकच्या इदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. ईद आणि आषाढीनिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. नाशिकच्या ईदगाह मैदानाच्या नमाजसाठी शेकडो मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली होती. तेव्हा बोलताना मुफ्ती इस्माईल यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला आहे.

भारत हा सुंदर देश आहे. त्याचं कारण म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक राहतात. सर्व धर्म आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहतात. समान नागरिक कायदा आला तर स्वतंत्रता संपेल. समान नागरी कायदा लागू झाला तर देशातले बहुसंख्य लोक विरोध करतील आणि कारण अनेक लोकांचं स्वातंत्र्य संपेल, असं मुफ्ती इस्माईल यांनी म्हणाले आहेत.

पसमंदा (दारिद्री) मुस्लिमांना समान नागरी कायद्याचा फायदा होईल असे नाही. अच्छे दिन ची वाट भारतातला प्रत्येक नागरिक पाहत आहे ते आलेच नाहीत. मुसलमानांची पसमानंदगी संपेल. हे लाकडाचे लाडू आहेत, असं म्हणत मुफ्ती इस्माईल यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलंय.

आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे या समान नागरी कायद्याला विरोध करण्याचा या देशातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. लोकांचा या कायद्याला विरोध आहे आणि लोक तो विरोध करतील, असं मुफ्ती इस्माईल यांनी म्हटलं आहे.

आधी पाकला छुपा पाठिंबा, आता तुर्कस्तान म्हणतंय, चांगल्या वाईट काळात...
आधी पाकला छुपा पाठिंबा, आता तुर्कस्तान म्हणतंय, चांगल्या वाईट काळात....
तेव्हा मला अजित दादांकडून ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
तेव्हा मला अजित दादांकडून ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट.
भारतानं एका झटक्यात पाकच्या चौक्या उडवल्या, व्हिडीओ पाहताच म्हणाल....
भारतानं एका झटक्यात पाकच्या चौक्या उडवल्या, व्हिडीओ पाहताच म्हणाल.....
संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक!
संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक!.
पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त
पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त.
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?.
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान.
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी.
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.