AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | गोदावरी नदीच्या पुरामुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील शेती पिकांना मोठा फटका!

शेतामध्ये पाणी शिरल्याने कांदा, ऊस, सोयाबीन, टोमॅटो, भुईमूग, मूग इत्यादी शेती पिके पाण्यातच आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचे विसर्ग येणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजनबद्ध केले असते तर शेतीचे नुकसान झाले नसते.

Nashik | गोदावरी नदीच्या पुरामुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील शेती पिकांना मोठा फटका!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 3:50 PM

नाशिक : गेल्या सहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) झाला. या पावसामुळे अनेक नद्यांना पूर (Flood) आला आणि नागरिकांच्या घरामध्ये थेट पावसाचे पाणी घुसले. इतकेच नाही तर पिकांनाही या पावसाचा मोठा फटका बसलायं. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला आलेल्या पुराचा नांदूर मधमेश्वर धरणाच्या बॅक वॉटरला (Back water) असलेल्या निफाड तालुक्यातील गोदाकाट परिसरात असलेल्या गावातील शेती पिकांना फटका बसला. पावसामध्ये अख्ख्ये पिक वाहून गेल्याने शेतकरी राजा मोठ्या चिंतेत आहे.

पावसाची सहा दिवस जोरदार बॅटिंग

नाशिकच्या पश्चिमेकडील त्रंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात पावसाने सहा दिवस जोरदार बॅटिंग केल्यामुळे दारणा आणि गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आल्याने या पुराचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या चांदोरी, सायखेडा, शिंगवे, चापडगाव, भुसे आणि करंजगाव या गावातील नदीकाठच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

पुरामुळे झाले शेतीचे मोठे नुकसान

शेतामध्ये पाणी शिरल्याने कांदा, ऊस, सोयाबीन, टोमॅटो, भुईमूग, मूग इत्यादी शेती पिके पाण्यातच आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचे विसर्ग येणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजनबद्ध केले असते तर शेतीचे नुकसान झाले नसते. योग्य नियोजन केल्यास शेतीचे नुकसान टाळता येईल याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आणि झालेले शेतीचे नुकसान भरपाई शासनाने करून द्यावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!.
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?.
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार.