AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीज बिल वसुलीला हिंसक विरोध करणाऱ्यांवर कठोर कारवाई करू, नितीन राऊतांचा इशारा

महावितरणचे कर्मचारी, अधिकारी यांना मारहाण करणे किंवा त्यांच्या विज बिल वसुलीच्या कामात अडथळे निर्माण करणे हे चुकीचे कृत्य आहे. असं करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल," असा इशारा डॉ. राऊत यांनी दिला आहे.

वीज बिल वसुलीला हिंसक विरोध करणाऱ्यांवर कठोर कारवाई करू, नितीन राऊतांचा इशारा
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 3:04 AM

मुंबई : “प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी संकटात सापडली आहे. ग्राहकांनी वीज बिल भरून या कंपनीला संकटातून बाहेर काढावे,” असं आवाहन राज्याचे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलं आहे. “भाजप नेत्यांनी कायदा हाती घेऊन महावितरणचे कर्मचारी, अधिकारी यांना मारहाण करणे किंवा त्यांच्या विज बिल वसुलीच्या कामात अडथळे निर्माण करणे हे चुकीचे कृत्य आहे. असं करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा डॉ. राऊत यांनी दिला आहे (Nitin Raut BJP over attack on MSEB employees in Maharashtra).

नितीन राऊत म्हणाले, “भाजपची सत्ता असताना त्यांनी हेतूपुरस्सरपणे केलेल्या गैरव्यवस्थापनामुळे आज महावितरणवर थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप आहे. प्रचंड थकबाकी वाढवून महावितरणचे खासगीकरण करण्याची रणनीती भाजपने आखली होती. मात्र आम्ही ही थकबाकी वसूल करून खासगीकरणाचे हे संकट टाळण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे अस्वस्थ झालेले भाजपचे नेते ठिकठिकाणी महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना लक्ष्य करीत आहेत.”

‘केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसची प्रचंड दरवाढ केली, त्यावर भाजप सोयीस्करपणे गप्प’

भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावचे अधिक्षक अभियंता शेख यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा उर्जामंत्री डॉ. राऊत यांनी निषेधही नोंदवला. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसची प्रचंड दरवाढ केली आहे. त्यामुळे महागाईही वाढत आहे. मात्र याविरूद्ध भाजपचे नेते सोयीस्कररीत्या काहीही बोलत नाहीत आणि वीज बिलाविरुद्ध मात्र आंदोलने करतात, अशी टीकाही डॉ. राऊत यांनी केली आहे. पेट्रोल,डिझेल असो की गॅस ही इंधने पैसे भरल्याशिवाय ग्राहकांना मिळत नाहीत. याउलट वीज मात्र आधी पुरविली जाते आणि नंतर बिल मागितले जाते, असंही ते म्हणाले.

सवलती देण्याचा अधिकार शासनाला

नितीन राऊत म्हणाले, “ग्राहकांना वेठीस धरणे हे आमचे उद्दिष्ट नाही. कोरोनाच्या काळातील वीज बिलांमध्ये सवलत देण्याची उर्जा विभागाची, माझी प्रामाणिक इच्छा होती. वीज बिल सवलतीसाठी लागणाऱ्या आर्थिक निधीची तरतूद करण्याचे अधिकार हे राज्य शासनाला आहे. केवळ उर्जा विभागाला हे अधिकार नाहीत. हे आपण लक्षात घ्यायला हवे. कोरोना काळातील विज बिलात विविध सवलती देण्याबाबत आम्ही राज्य शासनाच्या वित्त विभागाला किमान 7 प्रस्ताव पाठवले. मात्र कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याने राज्य सरकारलाही याबद्दल अद्याप निर्णय घेता आलेला नाही. महावितरणची आर्थिक स्थिती सुधारल्यावर ग्राहकांना सवलती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.”

“बिलच भरले नाही तर खर्च कसा करणार?”

“महावितरण एक सरकारी कंपनी असल्याने ती राज्यातील जनतेच्या मालकीची कंपनी आहे. त्यामुळे ही कंपनी जगवणे हे सुद्धा ग्राहकराजाचे कर्तव्यच आहे. वीज बिल वसुलीच्या 80 ते 85 टक्के रक्कम महावितरण ही वीज खरेदीसाठी वापरते. वसुलीच जवळपास ठप्प असेल तर राज्याला पुरविण्यासाठी वीज खरेदी कुठून करणार? उद्या राज्याला अंधारात जावे लागले, तर त्याला कोण जबाबदार असणार? ही प्रश्ने आपण सर्वांनीच स्वतःला विचारायला हवेत,” असंही राऊत यांनी नमूद केलं.

‘बिल भरले नाही तर हा खर्च कुठून करणार?’

नितीन राऊत म्हणाले, “महावितरणला कोळसा आणि तेल खरेदीसाठी दरवर्षी किमान 12 हजार कोटी खर्च येतो. सध्या कोळशाची टंचाई असून 3 दिवस पुरेल इतकाच कोळसा महानिर्मितीकडे आहे. बिल भरले नाही तर हा खर्च कुठून करणार? 2019-20 या आर्थिक वर्षात महावितरणला महानिर्मिती, केंद्र सरकार वा खासगी प्रकल्पांकडून वीज खरेदीसाठी 58,002 कोटी तर पारेषणवर 8773 कोटी असे मिळून केवळ खरेदी-पारेषणसाठी 66 हजार 775 कोटी खर्च करावा लागला.”

‘थकबाकीची रक्कम ही 71 हजार कोटीच्या घरात पोहोचली’

“कोरोनाच्या काळात महावितरणने राज्याला अखंडित वीज पुरवठा केला. गेल्या वर्षी ताळेबंदी लागू केल्यानंतर 1 एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या 10 महिन्यांत 1 रुपयाही देयक न भरणारे असे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषिपंप आदी विविध गटांत मिळून राज्यात तब्बल 80 लाख 32 हजार 283 ग्राहक होते. त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम ही 71 हजार कोटीच्या घरात पोहोचली होती,” असं राऊत यांनी सांगितलं.

‘एक तृतीयांश ग्राहकांनी या 10 महिन्यात एक रुपयाही भरला नाही’

नितीन राऊत म्हणाले, “राज्यातील वीज ग्राहकांची संख्या 2 कोटी 73 लाख असून जवळपास एक तृतीयांश ग्राहकांनी या 10 महिन्यात एक रुपयाही भरला नाही. त्यामुळे महावितरणचे अस्तित्व टिकवण्यासाठी राज्य सरकारला वीज बिल वसूलीसाठी नाईलाजाने थकबाकीदारांच्या वीज जोडण्या खंडित करण्याचे पाऊल उचलावे लागले आहे. मात्र असे करताना आपली बाजू मांडण्याची, आपले बिल तपासून घेण्याची संधी ग्राहकांना देण्यात आली आहे.”

‘कृषी वीज धोरणांतर्गत 15 हजार कोटींची थकबाकी माफ’

“कृषी ग्राहकांची थकबाकी 45 हजार कोटींच्यावर होती. कृषी वीज धोरणांतर्गत 15 हजार कोटींची थकबाकी माफ करण्यात आली आहे. याशिवाय पहिल्या वर्षात थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 15 हजार कोटींची सवलत मिळणार आहे. शेतकऱ्यांकडून वसूल केलेल्या थकबाकीपैकी 66 टक्के रक्कम संबंधित परिसरातच वीज विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही या धोरणास उत्तम प्रतिसाद दिला आहे,” असंही नितीन राऊत यांनी नमूद केलं.

“आजवर 843 कोटींची थकबाकी शेतकऱ्यांना जमा केली आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या नावाने, ग्राहकांच्या नावाने हिंसक प्रकार आणि महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील हल्ले वा त्यांच्या कामात अडथळे निर्माण करण्याचे प्रकार राज्य सरकार खपवून घेणार नाही,” असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

मंगळसूत्र गहाण ठेवा आणि वीज बिल घ्या, महावितरणच्या कार्यालयावर महिलांची धडक

अन्याय होत असेल तर आपल्या सरकारविरोधातही रस्त्यावर उतरा; नितीन राऊतांचं आवाहन

नितीन राऊत अॅक्शन मोडमध्ये, नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा कमी करण्यासाठी दहा सूचना

व्हिडीओ पाहा :

Nitin Raut BJP over attack on MSEB employees in Maharashtra

कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट.
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी.
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती.
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली.
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.