AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर 1 ऑक्टोबरपासून आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू, शशिकांत शिंदेंचा इशारा

केंद्र सरकारच्या नियमनमुक्ती कृषी कायद्यामुळे बाजार समित्या उद्ध्वस्त होत चालल्या असून, त्याचा मोठा परिणाम बाजार घटकांवर होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

...तर 1 ऑक्टोबरपासून आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू, शशिकांत शिंदेंचा इशारा
shashikant shinde
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 4:07 PM

नवी मुंबईः राज्य सरकार नव्याने कृषी कायदा आणणार असून, त्याबाबत बाजार समितीशी निगडित घटकांच्या सूचना राज्य सरकारने मागवल्यात. त्यामुळे बाजार घटकांची बाजार समिती मुख्यालयात बैठक पार पडली. ही बैठक आमदार शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती. केंद्र सरकारच्या नियमनमुक्ती कृषी कायद्यामुळे बाजार समित्या उद्ध्वस्त होत चालल्या असून, त्याचा मोठा परिणाम बाजार घटकांवर होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

तर पुराव्यासह आम्ही सरकार समोर आमच्या अडचणी मांडू

महत्त्वाचे म्हणजे 70 टक्के व्यापार संपला असून, केवळ 30 टक्के व्यापार बाजार आवारात उरला आहे. परिणामी सर्वच बाजार घटक अडचणी सापडले आहेत. तर पुराव्यासह आम्ही सरकार समोर आमच्या अडचणी मांडू तसेच सरकारने प्रतिसाद न दिल्यास 1 ऑक्टोबरपासून आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी या बैठकीत दिला.

सरकारकडून या कायद्याबाबत सूचना 20 सप्टेंबरपर्यंत करण्याचे आवाहन

राज्य सरकारने या कायद्याबाबत सूचना 20 सप्टेंबरपर्यंत करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सरकारला अडचणी सांगून सूचना करण्याकरिता आजची  बैठकीत घेण्यात आली. तर त्यात सर्व घटकांची समिती तयार करण्यात आली. यात सभापती, मार्केट संचालक, विविध संघटना आणि माथाडी कामगार यांचा समावेश करण्यात आला आहे. तर कशा प्रकारे विविध घटकांचे नुकसान या कायद्यामुळे होत यावर चर्चा करण्यात आली.

कामगारांचे उत्पन्न याबाबी सप्टेंबरला सादर करणार

कृषी कायदा लागू झाल्यापासून बाजार येणाऱ्या शेतमाल पासून आवक आणि उत्पन्न याच्यासह माथाडी कामगारांचे उत्पन्न याबाबी सप्टेंबरला सादर करणार आहोत. तर खासगी बाजारपेठा याला जबाबदार आहेत.  शिवाय माथाडी कामगार कशा प्रकारे बेरोजगार होत आहे.

अभ्यास करून राज्य सरकार पुढे आपल्या समस्या मांडणार

तसाच त्याच्या उत्पनावर कशा प्रकारे परिणाम होत गेला हे देखील मांडण्यात आले. त्यामुळे लवकरच स्थापन केलेली समिती अभ्यास करून राज्य सरकार पुढे आपल्या समस्या मांडणार आहे. या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, भाजीपाला, फळ, मसाला, कांदा-बटाटा  व धान्य मार्केट संचालक, माथाडी कामगार, विविध संघटना, असोसिएशन आणि त्यांचे पदाधिकारी मोठे संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Vegetables Rate: महापुराचा भाजीपाल्याला फटका, मुंबई बाजारसमिती भाज्यांचे दर घसरले, 100 गाड्या माल पडून

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळींची आवक वाढली, दरात घसरण

October 1, we will agitate in our own way, Shashikant Shinde warned

पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत.
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका.
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव.
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.