Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Fishing : सकमूर गावातील 25 शेतकरी करीत आहेत व्यवसाय, नदीलगत असलेल्या शेतात 5 शेततळे खोदून सोडले मत्स्यबीज

या चार दिवसात सुमारे सात ते आठ क्विंटल मासोळी विकली जाते. सकमूरच्या शेतकऱ्यांनी अनेक शेतीप्रयोग केले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली. आता तयार केलेल्या पाच शेततळ्यानी त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.

Chandrapur Fishing : सकमूर गावातील 25 शेतकरी करीत आहेत व्यवसाय, नदीलगत असलेल्या शेतात 5 शेततळे खोदून सोडले मत्स्यबीज
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर गावाचा पुढाकारImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 6:05 PM

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी (Gondpimpri) तालुक्यातील सकमूर हे गाव वर्धा नदीचा (Wardha River) काठावर वसले आहे. एकीकडे वर्धा नदीचे पात्र तर दुसरीकडे जंगल आहे. सकमूर गावातील शेतीला वन्यजीवांचा (Wildlife) नेहमीच धोका असतो. वर्धा नदी शेतकऱ्यांना वरदान आहे. मात्र नदीला पूर आला की शेती मातीमोल होते. शेतीत होणारे नुकसान बघता गावातील शेतकरी शेतीपुरक व्यवसायाकडे वळले आहेत. गावातील 25 शेतकऱ्यांनी शेतातील शेततळ्यात मस्त्यपालन सुरू केले आहे.

आठवड्यातून चार दिवस पकडतात मासे

शेततळ्यातील मासे ताजे असतात. त्यामुळं या माशांना मोठी मागणी आहे. यातून शेतकऱ्यांना बरीच मिळकत होत आहे. ताजे आणि चविष्ट मासे मिळत असल्याने ग्राहकांची याला मोठी मागणी आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता दूरवरून घाऊक मासोळी विक्रेते सकमूर गाव गाठतात. आठवड्यातून चार दिवस शेततळ्यातील मासे पकडले जातात.

शेततळ्यांनी उंचावला आर्थिक स्तर

या चार दिवसात सुमारे सात ते आठ क्विंटल मासोळी विकली जाते. सकमूरच्या शेतकऱ्यांनी अनेक शेतीप्रयोग केले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली. आता तयार केलेल्या पाच शेततळ्यानी त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.

हे सुद्धा वाचा

शेती काही भरोश्याची नाही

शेती आता भरवश्याची राहिलेली नाही. हे वाक्य नेहमी कानावर पडते. काही अंशी ते खरं ही आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी यामुळं बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. मोठ्या कष्टानं बळीराजा शेती फुलवितोय. प्रसंगी कर्ज काढतो. शेतीत अक्षरशः जीव ओततो. मात्र या शेतीची जेव्हा माती होतेय. तेव्हा हा राजा खचतोय. टोकाचा निर्णय घेतो.

कणखर बाणा काही खचत नाही

शेतीवर संकटाची मालिका सुरू असतानाही यातील बहुतांश शेतकरी काही खचत नाहीत. गोंडपिपरी तालुक्यातील सकमूरने हेच उदाहरण घालून दिले आहे. असं प्रयोगशील शेतकरी गजानन काळे यांनी सांगितलं. स्थानिक घाऊक मासे विक्रेत्यांनाही योग्य दरात येथे ताजे मासे मिळतात.

३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.