Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुख्यमंत्री सध्या रजेवर, तर माणुसकी असेल तर फडणवीस यांनी बारसूत जावं”; विरोधकांनी आंदोलनाला सरकारला जबाबदार धरलं

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बंदुका रोखल्या आहेत. जमिनीचे मालक असणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात हे सरकार दहशतवादी असल्यासारखे वागत असल्याचा घणाघातही खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे.

मुख्यमंत्री सध्या रजेवर, तर माणुसकी असेल तर फडणवीस यांनी बारसूत जावं; विरोधकांनी आंदोलनाला सरकारला जबाबदार धरलं
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 6:20 PM

मुंबई : बारसूतील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा आंदोलन छेडण्यात आले आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येत असून त्याविरोधात आता हजारो शेतकऱ्यांना आंदोलन छेडल्यामुळे हे प्रकरण पेटले आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहे, तर दुसरीकडे रिफायनरी प्रकल्प कोकणाचा विकास करण्याच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. त्यावरून आता खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली आहे.

बारसू येथील प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याने हे प्रकरण प्रचंड तापले आहे.

तर माध्यम प्रतिनिधींनाही पोलिसांनी हटवल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यावरून सरकारवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

जे शेतकरी आपल्या शेतीसाठी आंदोलन करत आहेत, त्या शेतकऱ्यांविरोधात सरकारवर दडपशाही पद्धतीने वागत आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बंदुका रोखल्या आहेत. जमिनीचे मालक असणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात हे सरकार दहशतवादी असल्यासारखे वागत असल्याचा घणाघातही खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे.

एकीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री रजेवर असल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्र्यांकडे थोडी तरी माणुसकी असेल तर त्यांनी एकदा बारसूमध्ये जाऊन शेतकऱ्यांबरोबर संवाद साधावा अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

बारसू आंदोलनावरून सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल चढविला आहे. शेतकऱ्यांबरोबर हे सरकार दहसशतवाद्यांप्रमाणे वागत असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.

खासदार संजय राऊत यांनी या सराकरला धारेवर धरत शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून त्यांनी सरकार आपली जबाबदारी झटकत आहे अशीही टीका त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.