आई-वडील हारले लढाई, तापानं दोन लेकरं हिरावली; रस्ता नसल्याने मृतदेह खांद्यावर घेत 15 किमीची पायपीट, त्यांच्या डोळ्यातील आसवांना सरकारकडे उत्तर आहे का?

Gadchiroli Child Deaths : गडचिरोली जिल्ह्यात दोन भावंडाचा तापामुळे मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रकारचा आटापिटा करणाऱ्या आई-वडीलांच्या खांद्यावर दोघांची मृतदेह गेली. या दोघांना 15 किमीची पायपीट करावी लागली. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

आई-वडील हारले लढाई, तापानं दोन लेकरं हिरावली; रस्ता नसल्याने मृतदेह खांद्यावर घेत 15 किमीची पायपीट, त्यांच्या डोळ्यातील आसवांना सरकारकडे उत्तर आहे का?
गडचिरोलीत आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 12:15 PM

आजोळी गेलेल्या दोन मुलांना अचानक ताप भरला. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली. गावातीलच पुजाऱ्याकडे या मुलांना जडीबुटी देण्यात आली होती. त्याचा काहीच गुण आला नाही. मुलांना सरकारी दवाखान्यात न्यायचे तर पक्का रस्ताच नसल्याने ॲम्बुलन्स नाही, दुसरे वाहन नाही. पण दुर्गम भागातील जिणे नशीबी आल्याने या दोघांना वाचवता आले नाही. मुलांचे दोन मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडीलांना 15 किलोमीटरची पायपीट करावी लागली. या दुर्दैवी घटनेवर जिल्हा परिषद कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अद्याप जिल्हा परिषद मार्फत या प्रकरणात कोणत्याही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका अंतर्गत येणाऱ्या “येर्रागड्डा” येथील रहिवासी रमेश वेलादी यांच्या मोठा मुलगा मोतीराम वेलादी  सहा वर्ष व दिनेश वेलादी साडेतीन वर्ष या दोन मुलांना मोठा गंभीर ताप आला. एका पुजाऱ्यांकडून जडीबुटीची औषध देण्यात आली. परिस्थिती गंभीर झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे या दोन चिमुकल्यांच्या मृत्यू झाला. जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध असताना आरोग्य विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. सध्या गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया आणि डेंगूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. या मुलांना मलेरिया झाल्याची प्राथमिक माहिती गावकऱ्यांनी दिली.

जिमलगटा येथे पोहोचल्यानंतर या दोन भावंडांच्या मृत्यू झाला. उपचारासाठी रुग्णवाहिका मागितली. रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रागात पालकांनी मृतदेह खांद्यावर घेऊन 15 किलोमीटरचा प्रवास केला. या सर्व प्रकारामुळे आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.एकीकडे आपण देशाच्या अमृत महोत्सव साजरा करीत असून या गंभीर प्रकरणावर जिल्हा परिषदेचा कोणती कारवाई करणार याकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

या सर्व प्रकारानंतर आता आई-वडिलांवर हा प्रकार ढकलण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणा करत असल्याचे समोर आले आहे. आई-वडिलांनी अगोदर पुजाऱ्याकडे उपचार केले आणि नंतर दवाखान्यात आणले. त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.