AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुटुंबातील सदस्यांकडून आईची हत्या, अखेर नातवाच्या चिकाटीमुळे खूनाचा गुन्हा दाखल

जिल्हा सत्र न्यायालयाने शिंदे यांच्या तक्रारीची दखल घेऊन तीन महिन्याच्या आत या प्रकरणाचा तपास करून हत्येप्रकरणी पाच आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले होते.

कुटुंबातील सदस्यांकडून आईची हत्या, अखेर नातवाच्या चिकाटीमुळे खूनाचा गुन्हा दाखल
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 6:57 PM

इचलकरंजी : कुटुंबातील सदस्यांकडूनच आईचा छळ करुन तिची हत्या झाल्याची दुर्दैवी घटना हातकणंगले तालुक्यातील रूकडी गावामध्ये घडली होती. मात्र पोलिसांनी या घटनेबाबत किरकोळ स्वरुपाचा गुन्हा दाखल करीत आकस्मित निधनाची नोंद केली होती. मात्र नातवाच्या पाठपुराव्यामुळे गुन्ह्याची उकल झाली असून याबाबत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले. हिराबाई नाईक असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे हातकणंगले परिसरात खळबळ माजली आहे.

न्यायासाठी नातवाची जिल्हा सत्र न्यायालयात धाव

हातकणंगले तालुक्यातील रूकडी गावामध्ये हिराबाई नाईक आपल्या कुटुंबासोबत राहतात. हिराबाई यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांचा छळ करीत असत. काही दिवसांपूर्वी हिराबाईंचा छळ करीत कुटुंबातील सदस्यांकडून त्यांची हत्या करण्यात आली. मात्र याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी गंभीर दखल घेतली नाही. उलट नाईक कुटुंबातील आरोपी असलेल्या पाच सदस्यांना पोलिसांनी अभय दिले. हिराबाईंच्या मृत्यूप्रकरणी किरकोळ गुन्हा दाखल करीत आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र हिराबाई यांचा नातू राजू शिंदे यांनी हातकणंगले पोलिसांना आजीचे निधन आकस्मित नसून हत्या आहे असे सांगितले. मात्र पोलिसांनी शिंदे यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करीत केवळ जबर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पोलीस प्रतिसाद देत नसल्याने शिंदे यांनी न्याय मिळवण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

न्यायालयाच्या आदेशानंतरही आठ दिवसांनी गुन्हा दाखल

जिल्हा सत्र न्यायालयाने शिंदे यांच्या तक्रारीची दखल घेऊन तीन महिन्याच्या आत या प्रकरणाचा तपास करून हत्येप्रकरणी पाच आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले होते. पण पोलिसांनी न्यायालयाचे आदेश असतानासुद्धा या प्रकरणी तात्काळ दखल न घेता आठ दिवसांनी 302 चा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या रूकडी गावामध्ये बिनदिक्कतपणे फिरत आहेत. पोलिसांच्या या भूमिकेमुळे नाईक आजीला न्याय मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. (Mother killed by family members in Ichalkaranji)

इतर बातम्या

अमेझॉन आणि फ्युचर ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीचे समन्स, आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश

बारमालकांनो सावधान! बिल मागितले म्हणून बार पेटविण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून लावली आग

तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश.
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या.
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती.
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.