Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपसमोर विधानसभेत 33 मतदारसंघात अडचण, कारण…’, राजकीय विश्लेषकाचा मोठा दावा

"आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर ३३ मतदारसंघात अडचण निर्माण होवू शकते. कारण गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या १०५ जागांपैकी २९ जागा भाजपने राष्ट्रवादी समोरच्या जिंकल्या आहेत", असा दावा राजकीय विश्लेषक प्रशांत आहेर यांनी केला आहे.

'भाजपसमोर विधानसभेत 33 मतदारसंघात अडचण, कारण...', राजकीय विश्लेषकाचा मोठा दावा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 27, 2024 | 9:50 PM

राज्यात पुढच्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती विचित्र आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये मोठी फूट पडली आहे. या दोन्ही पक्षांचा एक गट सत्तेत तर दुसरा गट विरोधात आहेत. त्यामुळे या दोन पक्षांपासून चार पक्षांची निर्मिती झाली आहे. या राजकीय परिस्थितीमुळे विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. अर्थात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय घडामोडी घडतात ते आगामी काळात स्पष्ट होईलच, पण या निवडणुकीत आहे तशी राजकीय परिस्थिती असल्यास प्रचारादरम्यान नैतिक आणि अनैतिकतेच्या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोप केले जाऊ शकतात. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्या पक्षाकडे किती जागांवर आव्हान आहे, याबाबत राजकीय विश्लेषक प्रशांत आहेर यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची युती होती. पण तरीदेखील दोन्ही पक्षांनी प्रत्येक मतदारसंघात बंडखोर उभे केले होते. त्याचा फटका त्यांना काही मतदारसंघांमध्ये बसला. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी जास्त आग्रही राहिले. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांची युती अधिकृतपणे तुटली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. पण हे सरकार अवघ्या अडीच वर्षात कोसळलं. यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलत गेली. या राजकीय परिस्थितीमुळे मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे. याबाबत राजकीय विश्लेषक प्रशांत आहेर यांनी महत्त्वाचं विश्लेषण केलं आहे.

राजकीय विश्लेषक प्रशांत आहेर काय म्हणाले?

राजकीय विश्लेषक प्रशांत आहेर यांनी मोठा दावा केला आहे. “आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर ३३ मतदारसंघात अडचण निर्माण होवू शकते. कारण गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या १०५ जागांपैकी २९ जागा भाजपने राष्ट्रवादी समोरच्या जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या ५४ जागांपैकी २५ जागा या राष्ट्रवादी शरद पवार गटासमोर समोर आहेत. भाजप समोर ३३ जागांवर अडचणी आहेत. त्यामुळे शरद पवारांनी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. भाजप नेते समरजीत घाडगे हे त्याचंच उदाहरण आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याशी पण संपर्क केला. हर्षवर्धन पाटील पक्षात जाणार नाहीत. मात्र अपक्ष निवडणूक लढवू शकतात. २००४ ला राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती पुन्हा निर्माण होवू शकते”, असा मोठा दावा प्रशांत आहेर यांनी केला.

संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.