AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर पुणे शहरात पाणी कपात होणार, 18 मे पासून पुण्यात पाणी कपात ‘या’ दिवशी पाणी कपात

गेल्या काही आठवड्यांपासून पाणी कपात होईल अशी चर्चा सुरू असतांना पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणी कपात करत असल्याचे जाहीर केले आहे.

अखेर पुणे शहरात पाणी कपात होणार, 18 मे पासून पुण्यात पाणी कपात 'या' दिवशी पाणी कपात
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 7:31 PM

पुणे : गेल्या काही आठवड्यांपासून पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. अखेर त्याबाबत निर्णय झाला असून 18 मे पासून पुणे शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेने घेतला आहे. दर गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगर पालिकेने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळा लांबण्याची शक्यता असल्याने पुणे महानगर पालिकेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरासह जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण, साखरी क्षेत्रात पाणीसाठा कमी असल्याने आता शहराला दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहेत. याशिवाय यंदाचा पावसाळा लांबण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवला आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज पाणी नियोजनासाठी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वानुमते हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पाणी पुरवठा विभागाचे अनिरुद्ध पावसकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दक्षिण महासागरामध्ये अल निनो वादळ निर्माण होऊन त्याचा परिणाम मॉन्सून लांबणीवर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून राज्य शासनाने पाणीटंचाईचा आराखडा सादर करण्याच्या स्थानिक प्रशासनाला दिलेल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

धरणातील पाणीसाठा बघता आणि भविष्यातील पाऊस पडण्याचा अंदाज बघता पुणे महानगर पालिकेने दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे अनेक हवामान अभ्यासकांनी पावसाबाबत काही अंदाज वर्तविले आहे. त्यामध्ये जुलै अखेर पर्यन्त पाणीसाठा असणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

पुणे महानगर पालिकेच्या वतीने यापूर्वी पाण्याच्या संदर्भात बैठक घेतली होती. त्यामध्ये धरणात असलेल्या पाणी साठयासह पावसाचा अंदाज घेतला होता. त्यामध्ये काही आठवडे उलटल्यानंतर पाणी कपात होऊ शकते अशी शक्यता होती. त्यामुळे पाणी कपातीची टांगती तलवार कायम होती.

आज पाणी कपातीच्या संदर्भात अखेर निर्णय झाला आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे 18 मे पासून हा निर्णय लागू होणार आहे. मे, जून आणि जुलै या महिण्यात पाणी कपात सध्याची परिस्थिती पाहता राहील. नंतरच्या काळात पुन्हा काही बदल झाल्यास पाणी कपातीच्या संदर्भात बैठक घेऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.

एकूणच पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. त्यामध्ये पाण्याची काटकसर जितक्या प्रमाणात करता येईल तितक्या प्रमाणात पाणी जपून वापरणे काळजी गरज आहे.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.