Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune rain : बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद, खडकवासला धरणातून पाण्यचा विसर्ग वाढवल्यानं नदीपात्रातून भरभरून वाहतंय पाणी

बंगालच्या उपसागरात सध्या तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता वादळात रूपांतरित झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने हा इशारा दिला आहे.

Pune rain : बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद, खडकवासला धरणातून पाण्यचा विसर्ग वाढवल्यानं नदीपात्रातून भरभरून वाहतंय पाणी
बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंदImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 11:49 AM

अभिजीत पोते, पुणे : खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळीमध्ये सुरू असणाऱ्या पावसाच्या संततधारेमुळे धरण साखळीतील चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे काल रात्री अकरा वाजता खडकवासला धरणामधून 12,321 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग (Water released) करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील रस्ता आता प्रशासनाकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांत मिळून 29.15 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यासोबतच पावसाचा जोर (Heavy rain) पाहता हा विसर्ग वाढवला जाऊ शकतो, अशी माहितीदेखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुणे शहरात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र जिल्ह्यातील धरणसाखळी परिसरात अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

‘नागरिकांनी पर्यायी पुलांचा वापर करावा’

रात्रीपासून हा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात पाणी वाढल्याने बाबा भिडे पूलदेखील भरून वाहत आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी पुलांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर बाबा भिडे पूल बंद करण्यात आला होता. आता पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवल्याने तो बंद करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

बाबा भिडे पूल बंद

तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात सध्या तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता वादळात रूपांतरित झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने हा इशारा दिला आहे. याच काळात पुणे शहर व जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार आहे. घाटमाथ्याच्या तसेच धरण परिसरातही पावसाचा जोर अधिक असू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे आधीच धरणे भरली आहेत. त्यात अधिकचा पाऊस पडणार असल्याने विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.