AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhav Bhandari : तरुणांची संख्या सैन्य दलात वाढू नये, असा विचार करणाऱ्या शक्ती कोण? ‘अग्निपथ’वरून माधव भांडारींचा राहुल गांधींना टोला

राज्यसभेला घोडेबाजार झाला नाही. त्यावेळी सर्व आमदारांनी आपापल्या बुद्धीनुसार मतदान केले आणि येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीतदेखील तेच होईल, असे वक्तव्य माधव भांडारी यांनी केले आहे. आगामी विधान परिषदेसंबंधी त्यांनी आपले मत व्यक्त केले.

Madhav Bhandari : तरुणांची संख्या सैन्य दलात वाढू नये, असा विचार करणाऱ्या शक्ती कोण? 'अग्निपथ'वरून माधव भांडारींचा राहुल गांधींना टोला
विरोधकांवर टीका करताना भाजपा नेते माधव भांडारीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 2:19 PM

पुणे : तरुणांना चार वर्षांची का असेना पण रोजगार मिळवून देणारी अग्निपथ (Agneepath Scheme) ही योजना आहे. केंद्र सरकारने योजना आणल्यावर लगेच ती योजना हाणून पाडण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत आहेत. लोकांना काम मिळू नये, यासाठी काम करणाऱ्या शक्तीचे नेतृत्व जर राहुल गांधी करत असतील तर मग दुर्दैव आहे, अशी टीका भाजपा नेते माधव भांडारी (Madhav Bhandari) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. अग्निपथ योजनेला देशभर विरोध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधींना (Rahul Gandhi) मार्गदर्शन करणाऱ्या शक्ती देशात आहेत, की विदेशात हा प्रश्न त्यांना विचारायला हवा, असा टोला त्यांनी लगावला आहे. तरूण हा लष्करीदृष्ट्या मजबूत होण्यासाठी ही योजना आहे. मग तरुणांची संख्या सैन्य दलामध्ये वाढू नये, असा विचार करणाऱ्या शक्ती कोण आहेत, याचा शोध घ्यायला हवा, अशी टीका त्यांनी यावेळी राहुल गांधींवर केली आहे.

‘घोडेबाजार झाला हे मी मानत नाही’

राज्यसभेला घोडेबाजार झाला नाही. त्यावेळी सर्व आमदारांनी आपापल्या बुद्धीनुसार मतदान केले आणि येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीतदेखील तेच होईल, असे वक्तव्य माधव भांडारी यांनी केले आहे. आगामी विधान परिषदेसंबंधी त्यांनी आपले मत व्यक्त केले. विधान परिषदेचे मैदान जवळ आहे. कोण जिंकणार, याचा खुलासा लवकरच होईल. निवडणुकीबाबत आमच्या नेत्यांना आत्मविश्वास आहे. आम्ही नक्की जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. महाविकास आघाडी हे तिघाडी सरकार आहे. सरकारमधील तिन्ही पक्षांमध्येच नाही, तर पक्षांच्या अंतर्गत विरोध आहे. याचेच परिणाम राज्याच्या राजकारणावरदेखील होत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

‘जनतेच्या हिताचे प्रश्न हाताळले जात नाहीत’

महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत विरोधामुळे केवळ राजकारण होत आहे. त्यांच्यात एकवाक्यता नाही. याचेच परिणाम राज्याच्या राजकारणावरदेखील होत आहेत. जनतेच्या हिताचे प्रश्न हाताळले जात नाहीत. भाजपाचा विरोध हा केवळ शिवसेनेला नाही तर महाविकास आघाडीलाच आहे. सत्ताधारी पक्षाने पुढाकार घेऊन निवडणुका या बिनवरोधी करायच्या असतात. राज्यात आधी या सगळ्या निवडणुका होत नव्हत्या. आता होत आहेत. याला सरकार जबाबदार आहे. कारण सरकार विरोधकांशी कुठलाच संवाद करत नाही, अशी टीका त्यांनी केली.

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.