AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raosaheb Danve : राज्य सरकारच्या नियोजनाअभावी सहन करावी लागतेय कोळसाटंचाई; रावसाहेब दानवेंचा पुण्यात हल्लाबोल

उद्धव ठाकरेंच्या घरासमोर आंदोलन सुरू आहे. तर पोलीस मूकभूमिका घेत आहेत. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका दानवे यांनी केली. राज्यातले सरकार हे अमर, अकबर, अँथनीचे असल्याचे खासदार रावसाहेब दानवे म्हणाले.

Raosaheb Danve : राज्य सरकारच्या नियोजनाअभावी सहन करावी लागतेय कोळसाटंचाई; रावसाहेब दानवेंचा पुण्यात हल्लाबोल
रावसाहेब दानवेंनी दाराआडचं राजकारण थेट बाहेर आणलंImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 4:26 PM

पुणे : गेली एक महिना राज्यात विजेची टंचाई (Electricity shortage) आहे. या टंचाईला राज्य सरकार जबाबदार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना, अन्य क्षेत्रांना वीज पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मात्र एक महिना सरकार सांगत आहे, कोळसा मिळाला नाही. रेल्वेचा रँक मिळाला नाही. असे म्हणून स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याची टीका खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली आहे. कोळशाची टंचाई केवळ नियोजनाअभावी सहन करावी लागत आहे. यासंबंधी आम्ही जानेवारीत पत्र लिहून सांगितले होते, की कोळशाचे (Coal) नियोजन करा, 15 दिवसाचे नियोजन हवे. मात्र हे तीन पक्षाचे सरकार आहे. कधी ते एकत्र बसत नाहीत. वेळ आली, की केंद्र सरकारवर खापर फोडतात. त्यांना केंद्र सरकारविरोधात बोंबलण्याचे कामच सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे.

‘…तरीही कोळसा थांबवलेला नाही’

3 हजार कोटी रुपये हे कोळशाचे राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येणे बाकी आहे. तरीही आम्ही कोळसा थांबवलेला नाही. उन्हाळ्यात कोळसा जास्त लागतो. राज्य सरकारने कोळशाचा साठा करून ठेवायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. राज्य सरकारला मागणी आहे, की लोडशेडिंग करू नका. राज्य म्हणत असेल, की बाहेरून कोळसा आणायला परवानगी द्या तर ती आम्ही परवानगी देत आहोत. पण परवानगीची गरज नाही. राज्य सरकारने वीज खरेदी करावी आणि ती द्यावी. ते लोडशेडिंग करणार नाही म्हणत आहेत. मात्र दुरुस्तीच्या नावाखाली लोडशेडिंग सुरूच आहे.

‘कायदा-सुव्यवस्था बिघडली’

राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. काल मोहित कंबोज यांच्यावर हल्ला झाला. पोलखोल यात्रेवर दगडफेक झाली. हनुमान चालिसा म्हटली पाहिजे एवढीच त्यांची भूमिका आहे. उद्धव ठाकरेंच्या घरासमोर आंदोलन सुरू आहे. तर पोलीस मूकभूमिका घेत आहेत. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका दानवे यांनी केली. राज्यातले सरकार हे अमर, अकबर, अँथनीचे असल्याचे ते म्हणाले.

आणखी वाचा :

Krishna Prakash met Sharad Pawar : बदलीनंतर आयर्नमॅन कृष्णप्रकाश यांनी गोविंदबागेत घेतली शरद पवारांची भेट

Pune Neelam Gorhe : नवनीत राणा आणि रवी राणा हे भाजपाचे भाडोत्री शेंदाडशिपाई; हनुमान चालिसावरून नीलम गोऱ्हेंचा बाण

Supriya Sule : किती हल्ले झाले, मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्दही काढला नाही, त्यांच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान; सुप्रिया सुळेंकडून कौतुक

ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा.
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री.
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक.
दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी - मोदी
दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी - मोदी.
मोदींनी आदमपूर एअरबेसबाबत पाकच्या खोट्या दाव्यांचा बुरखा टराटरा फाडला
मोदींनी आदमपूर एअरबेसबाबत पाकच्या खोट्या दाव्यांचा बुरखा टराटरा फाडला.
शोपियानमध्ये ठार केलेल्या 2 दहशतवाद्यांची ओळख पटली
शोपियानमध्ये ठार केलेल्या 2 दहशतवाद्यांची ओळख पटली.
ऑपरेशन सिंदूरचा हिरो, ज्याच्यामुळे पाकला फुटला घाम, अमरप्रीत सिंग कोण?
ऑपरेशन सिंदूरचा हिरो, ज्याच्यामुळे पाकला फुटला घाम, अमरप्रीत सिंग कोण?.