अयोध्येतील राममंदिर उद्ध्वस्त व्हावे, असे काही लोकांचे मनसुबे… गोविंदगिरी महाराज यांचा रोख कुणाकडे

ram temple construction ayodhya | अयोध्या येथे उभारण्यात येणारे श्री राममंदिर उद्ध्वस्त व्हावे, असे काही लोकांचे मनसुबे आहेत. यामुळे आता केवळ रामाची प्रतिष्ठापना करून आणि मंदिर पूर्ण बांधून चालणार नाही तर आपली मंदिरे पुन्हा, पुन्हा का तोडली गेली? याचा विचार केला गेला पाहिजे.

अयोध्येतील राममंदिर उद्ध्वस्त व्हावे, असे काही लोकांचे मनसुबे... गोविंदगिरी महाराज यांचा रोख कुणाकडे
govind giri maharaj
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 12:19 PM

योगेश बोरसे, पुणे | 11 डिसेंबर 2023 : अयोध्यात श्री राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरु आहे. येत्या जानेवारी महिन्यात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. एकीकडे या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरु असताना श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्याचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी पुणे येथे धक्कादायक विधान केले आहे. राममंदिर उद्ध्वस्त व्हावे, असे काही लोकांचे मनसुबे आहेत. यामुळे आता रामाची प्रतिष्ठापना करून आणि मंदिर पूर्ण बांधून चालणार नाही तर आपली मंदिरे पुन्हा, पुन्हा का तोडली गेली? का उद्ध्वस्त केली गेली याची कारण मीमांसा होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी तुकडे तुकडे गँग आणि त्या पद्धतीच्या मनोवृत्तीवर टीका केली.

तुकडे-तुकडे गँगचे मनसुबे

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील भगवान रामच्या वस्त्रांसाठी ‘दोन धागे श्रीरामासाठी’ या उपक्रमाचे उद्घाटन पुणे येथे करण्यात आले. श्रीरामाचा पोशाख पुणे येथून विणून घेतला जात आहे. लोकसहभागातून हा उपक्रम सुरु आहे. याचे उद्घाटन गोविंदगिरी महाराज यांनी केले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी तुकडे, तुकडे गँगवर कठोर टीका केली. हे मंदिर जेव्हा उभे होत आहे, त्याच वेळेला अनेक लोकांचे मनसुबे असे आहेत की मंदिर उभे होऊ नये. देशात ज्याप्रमाणे जुनी मंदिरे निस्तनाबूत झाली, तसेच काहीतरी याही मंदिरासाठी करता यावे, अशा प्रकारची मनसुबे तुकडे तुकडे गँगचे आहे. यामुळे आता सर्वांना जरब निर्माण करण्याची गरज आहे. आता केवळ रामाचे मंदिर उभा करून चालणार नाही तर समर्थ राष्ट्र मंदिर उभा करण्याची गरज आहे. हे राष्ट्र बलशाली झालं पाहिजे.

हे सुद्धा वाचा

योगी यांचे केले समर्थन, दिले असे उदाहरण

एकदा रामायण वाचताना मला विचार आला “When crime is confirmed encounter is the only solution” म्हणजे गुन्हे वाढले की एन्काऊंटर हाच उपाय आहे. रामायणात वाली याचे गुन्हे वाढले होते. त्यामुळे प्रभू राम यांना त्याचे एन्काऊंटर केले. त्यामुळे आता आपल्या देशात योगीजी यांनी जे “बुलडोझर कल्चर” सुरु केले आहे, ते गरजेचे आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.