Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे; हसन मुश्रीफ यांचा तोल सुटला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. (hasan mushrif slams chandrakant patil over remarks on ajit pawar)

चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे; हसन मुश्रीफ यांचा तोल सुटला
हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 5:10 PM

कोल्हापूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तोल सुटला. चंद्रकांतदादांना काय बोलावं हे कळत नाही. त्यांना मस्ती आली आहे, असं धक्कादायक वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (hasan mushrif slams chandrakant patil over remarks on ajit pawar)

हसन मुश्रीफ यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे. दादांनी आधी छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांना तंबी दिली होती. हे बरोबर नाही. दादांवर आता चांगलं कार्टुन आलं आहे. आपलं हसं होऊ नये म्हणून दादांनी आता अशी वक्तव्य करणं टाळावं, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

केंद्राकडून महाराष्ट्राचा अपमान

आरोग्य सेवेच्या साहित्य खरेदीतील जीएसटी रद्द करा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादांनी केली आहे. त्यावर या मागणीचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने समिती तयार केली आहे. त्या समितीचे अध्यक्षपद मेघालय सारख्या छोट्या राज्याच्या अर्थ मंत्र्याला दिले. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र मोठं राज्य असताना असा अपमान का केला? केंद्र सरकार सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करत असते, असं ते म्हणाले.

तो परमबीर सिंगांचा दुसरा भाऊच

यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात झालेल्या तक्रारीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. परिवहनचे निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील याने अनिल परब यांच्या विरोधात तक्रार केली आहे. हा परमबीर सिंग यांचा दुसरा भाऊच दिसतो, असं सांगतानाच खाकी वेशातील हे दरोडेखोरच आहेत, अशी टीका त्यांनी केली.

काय म्हणाले चंद्रकांतदादा?

आज सकाळी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली होती. अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा पाटील यांनी दिल आहे. झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करून मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होतं, ही गोष्ट लक्षात राहत नाही, असे ते म्हणाले होते. (hasan mushrif slams chandrakant patil over remarks on ajit pawar)

संबंधित बातम्या:

अजितदादा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर महागात पडेल: चंद्रकांत पाटील

चंद्रकांतदादांना स्वप्ने बघण्याचा छंद, त्यावर काय बोलणार?; जयंत पाटलांची खोचक टीका

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, अर्धा तास खलबतं; चर्चा मात्र गुलदस्त्यात

(hasan mushrif slams chandrakant patil over remarks on ajit pawar)

युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.