Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update | राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, कोणत्या जिल्ह्यास दिला अलर्ट

Rain Update | राज्यात मान्सूनचा हंगाम संपला आहे. आता परतीचा पाऊस सुरु होणार आहे. राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे हवामान विभागाने पुढील चार दिवस पाऊस असणार असल्याचे म्हटले आहे.

Rain Update | राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, कोणत्या जिल्ह्यास दिला अलर्ट
Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 01, 2023 | 9:16 AM

पुणे | 1 ऑक्टोंबर 2023 : महाराष्ट्रात मान्सूनचा हंगाम संपला आहे. आता परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. यंदा राज्यात उशिराने मान्सून दाखल झाला. त्यानंतर अनेक जिल्ह्यात पावसाने सरासरी अद्याप गाठली नाही. सप्टेंबर महिन्यात सुरु असलेला पाऊस ऑक्टोंबरच्या सुरुवातीला कायम आहे. राज्यात पुढील चार दिवस पाऊस असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात शनिवार रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू आहे.

काय आहे पावसाचा अंदाज

पुणे परिसरात रविवारी दिवसभर पावसाचा अंदाज आहे. तसेच पुढील तीन दिवस पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस असणार आहे. हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावासाचा अंदाज आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कराडमध्येही रविवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील चार दिवस पाऊस असणार आहे. कोकणातही पुढील चार दिवस मुसळधार पाऊस असणार आहे.

पुणे परिसरातील धरणे भरली

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 97% म्हणजेच 28 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पुणे परिसरातील टेमघर वगळता इतर सर्व धरणे भरले आहेत. पुणे परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पुणे शहर आणि घाट परिसरात चांगला पावासाची शक्यता व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा
  • खडकवासला: १०० टक्के पाणीसाठा
  • पानशेत: १०० टक्के पाणीसाठा
  • वरसगाव: १०० टक्के पाणीसाठा
  • टेमघर: ७९.२१ टक्के पाणीसाठा

परतीचा पाऊस भात पिकांसाठी लाभदायक

मावळ तालुक्यात पडत असलेला परतीचा पाऊस हा भातपिकांसाठी पोषक आहे. सध्या इंद्रायणी भात पिके जोमात आले आहे. सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकाला संजीवनी मिळाली आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे. परंतु ज्या ठिकाणी पावसाचे जास्त पाणी साठत असेल त्या ठिकाणी सांडव्यातून पाणी बाहेर काढावे, अशी सूचना मावळ कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांनी केली आहे.

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.