Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

७० किमी प्रवास करुन पाच क्विंटल कांदा विकला, शेतकऱ्याला मिळाले २ रुपये, चेक पाहून रडूच कोसळले

५१२ किलो कांदा ७० किलोमीटर प्रवास करुन विकायला आणला. बाजार समितीत त्यासाठी ५१२ रुपये मिळाले. परंतु तोलाई, हमाली असा बाजार समितीमधील खर्च वजा करुन शेवटी २ रुपयांचा चेक त्याला मिळाला.

७० किमी प्रवास करुन पाच क्विंटल कांदा विकला, शेतकऱ्याला मिळाले २ रुपये, चेक पाहून रडूच कोसळले
कांदा दरात घसरण
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 11:50 AM

सोलापूर : शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नाही. त्यासाठी अनेक सरकारे आली अन् गेली. परंतु बळीराजाची व्यथा कोणी दूर करु शकला नाही. आश्वासन आणि निवडणूक घोषणांशिवाय शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा त्यांच्या मालास भाव मिळवून देणारे सरकार पाहिजे. परंतु अजूनही ते स्वप्न आहे. सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांने दोन एकर शेतात कांदा लावला. त्यातील ५१२ किलो कांदा ७० किलोमीटर प्रवास करुन विकायला आणला. बाजार समितीत त्यासाठी त्यांना ५१२ रुपये मिळाले. परंतु तोलाई, हमाली असा बाजार समितीमधील खर्च वजा करुन शेवटी २ रुपयांचा चेक त्याला मिळाला. मग हा चेक पाहून त्या बळीराज्यास रुडूच कोसळले.

चेक मिळाला अन् रडू कोसळले

हे सुद्धा वाचा

सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव येथील शेतकऱ्याची ही व्यथा आहे. राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने १७ फेब्रुवारी रोजी ५१२ किलो कांदा विकण्यासाठी बाजार समितीत आणला. ५१२ किलो कांद्यासाठी त्यांना ५१२ रुपये मिळाले. त्यातून हमाली ४०.४५, तोलाई २४.०६, भाडा १५ रुपये, रोख उचल ४३० रुपये असे एकूण ५०९ रुपये ५१ पैसै वजा करण्यात आले. त्यानंतर त्यांना २ रुपये ४९ पैशांचा चेक देण्यात आला. या चेकवरही तारीख ८ मार्च २०२३ दिली आहे. दोन रुपयांचा हा चेक पाहून राजेंद्र चव्हाण यांना रडूच कोसळले.

कांदा दरात घसरण

बांगलादेश आणि श्रीलंकेत होणारी कांद्याची निर्यात थांबली आहे. तसेच देशात इतर ठिकाणी कांद्याचे चांगले उत्पादन झाले आहे. यामुळे नाशिकसह महाराष्ट्रातील लाल कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट झाले. प्रथमच कांद्याचे दर ५०० रुपये क्विंटलवर आले आहेत. दर गडगडल्याने कांदा बाजारात विकण्याऐवजी रस्त्यावर फेकण्याची वेळ राज्यातील शेतकऱ्यांवर आली.

चार वर्षांचा नीचांक

महाराष्ट्रात कांद्याचे दरात गेल्या चार वर्षांतील नीचांक आहे. मागील तीन वर्षे कांद्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार रुपयांचा दर मिळाला होता. जानेवारीत लासलगाव बाजारात ११ लाख ६२ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. त्यावेळी सरासरी १३९२ रुपये प्रति क्विंटलचा दर कांद्याला मिळाला होता. परंतु फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे दर अधिकच घसरले आहेत.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.