Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार अन् गिरीश बापट यांच्या ‘त्या’ सभाही विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत

कसबा पेठेते ब्राह्मण उमेदवार दिला नाही, यामुळे नेहमी भाजपसोबत असणार समाज नाराज झाला. यासंदर्भात बॅनरबाजी करण्यात आली.

शरद पवार अन् गिरीश बापट यांच्या 'त्या' सभाही विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत
गिरीश बापट अन् शरद पवारImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 2:34 PM

पुणे : कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीचा (BY Election) निकाल लागला आहे. कसबा पेठेत भाजपला धक्का बसला तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला हादरा बसला. ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करण्यासाठी कसबा पेठेत भाजपने आजारी बापट यांना व्हिलचेअरवरुन आणले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले पोटनिवडणुकीत न वापरणारे पवार अस्त्र बाहेर काढले होते. परंतु मतदार राजाने ही दोन्ही अस्त्र निकामी केली. अन् मतदार काय असतो, हे दाखवून दिले.

पिंपरी-चिंचवड हा कधीकाळी राष्ट्रवादीचा गड होता. दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप हे कधीकाळी राष्ट्रवादीचे नेते होते. अजित पवार यांच्या सर्वांत जवळचे सहकारी होते. परंतु ते भाजपत गेल्यावर राष्ट्रवादीचा गड हालला. हा गड पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पवार यांचे अस्त्र बाहेर काढले. शरद पवार यांनी २१ फेब्रुवारी रोजी सभा घेतली. त्यावेळी स्वत: शरद पवार म्हणाले होते की,आपण पोटनिवडणूक प्रचाराला जात नाही. पण पक्षाच्या पडत्या काळात ज्यांनी पक्षाला साथ दिली त्यांच्याशी दोन शब्द बोलता येईल म्हणून मी आलो आहे.

हे सुद्धा वाचा

जयंत पाटील यांना आठवली साताऱ्याची सभा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या पावसातील सभेचा संदर्भ दिला. शरद पवारांच्या पावसातील सभेमुळं अनेकांची मतं वाढली. काँग्रेस असो वा पुरस्कृत उमेदवार असो त्यांचा ही फायदा झाला. आता त्याची पुनरावृत्ती होईल. परंतु जयंत पाटील यांचा आशावाद मतदारांनी फोल ठरवला.

कसबा पेठेत ब्राह्मण समाज नाराज

कसबा पेठेते ब्राह्मण उमेदवार दिला नाही, यामुळे नेहमी भाजपसोबत असणार समाज नाराज झाला. यासंदर्भात बॅनरबाजी करण्यात आली. त्यात म्हटले होते, कुलकर्णींचा मतदार संघ गेला, टिळकांचा मतदार संघ गेला, आता नंबर बापटांचा का?…समाज कुठवर सहन करणार

आणखी एक चर्चेतील बॅनर होते, त्यात म्हटले होते की, आमचेही ठरेल धडा शिकवायचा, कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा हा टिळकांचा, का काढला आमच्याकडून कसबा…

y

भाजपचा सर्व्हे

त्यानंतर भाजपने अंतर्गत सर्व्हे केला. त्यात हेमंत रासने पराभूत होणार असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपने आजारी असलेल्या गिरीश बापट यांना प्रचारात आणले. गिरीश बापट व्हिलचेअरवर बसून नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून प्रचारात सहभागी झाले होते.

त्यावेळी खासदार बापट म्हणाले होते की, हेमंतचं काम चांगलं आहे. महापालिकेच्या माध्यमातून त्याने चांगलं काम केलं आहे. हेमंतला निवडून द्या. थोडी जास्त ताकद लावा. निवडून आल्यावर मी पेढा घ्यायला परत येणार आहे. आजारी बापट यांना पाहून अनेक महिलांना आपले अश्रूही रोखता आले नव्हते. परंतु निवडणूक निकालानंतर भाजपाचे हे अस्त्रही ब्राह्मण समाजाची नाराजी दूर शकले नाही, हे स्पष्ट झाले. यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला.

भाजपचा गड गेला, कसबा पोटनिवडणुकीत १९९१ चा इतिहास २०२३ मध्ये पुन्हा घडला

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.