Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर वारकऱ्यांवर लाठीमारची घटना टळली असती, आळंदी मंदिर प्रशासनाने सोडले मौन

Pandharpur Wari : पाच दिवसांपूर्वी आळंदी येथे मंदिरात जाण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर सरकारावर विरोधकांनी टीका केली होती. या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केल्यानंतर मंदिर प्रशासनाकडूनही आता खुलासा आलाय.

...तर वारकऱ्यांवर लाठीमारची घटना टळली असती, आळंदी मंदिर प्रशासनाने सोडले मौन
Alandi temple
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 12:53 PM

रणजित जाधव, आळंदी, पुणे : आळंदी येथे मंदिरात जाण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. त्यावरुन विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने सरकारवर जोरदार टीका केली होती. मनसेनेही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरानंतर पाच दिवसांनी आळंदी मंदिर प्रशासनाने मौन सोडले आहे. हा प्रकार कसा घडला अन् कसा टाळता आला असता, हे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.

काय म्हटलंय मंदिर प्रशासनाने

श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्तावनावेळी घडलेल्या परिस्थितीवर संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने खुलासा करण्यात आलाय. त्या खुलासानुसार २०१७-१८ पासूनच मंदिरात प्रस्थानाला होणाऱ्या गर्दी बाबत चर्चा सुरू होती. त्या संबंधी मान्यताप्राप्त वास्तू विशारद संस्थेकडून अभ्यास करून मंदिरातील प्रदक्षिणा मार्गावर साधारणपणे ४५०० हजार लोक सुरक्षित वावरू आणि खेळू शकतील, हे समोर आले. त्यानुसार ४७ दिंडीतील ७५ वारकऱ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोणी घातली पोलिसांशी हुज्जत

पालखी प्रस्थनाला सुरुवात होत असताना जोग वारकरी शिक्षण संस्थेतील ३०० ते ४०० विद्यार्थ्यांनी मंदिरात प्रवेश घेण्यासाठी आले. या विद्यार्थ्यांनी मंदिरात प्रवेशासाठी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यातील ३५ जणांना प्रवेश देण्याचे मान्य केले तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी बळजबरीने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि पुढची कारवाई झाली. विद्यार्थी सामंज्यस्याने वागले असते तर हे घडले नसते असं मंदिर प्रशासनाने स्पष्ट केलंय.

हे सुद्धा वाचा

काय होता गृहमंत्र्यांचा दावा

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी लाठीमार झाला नसून फक्त वारकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला, असा दावा केला होता. गेल्या वर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या. या वेळी हे प्रकार टाळण्यासाठी मंदिर समितीने बैठक घेतली. या बैठकीत प्रत्येक मानाच्या दिंडीला ७५ पासेस देण्याचा निर्णय घेतला होता. पण काही वारकरी, तरुणांनी पासेस नसताना आत जाण्याचा आग्रह धरला. काही जणांनी बॅरिकेड्स तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी त्यांना रोखले. या वेळी थोडी झटापट झाली अन् या झटपटीत काही पोलिसही देखील जखमी झाले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.