Chandrayaan : चंद्रयान-3 मध्ये पुणे शहरातील या कंपनीचा खारीचा वाटा, इस्त्रोसोबत अनेक वर्षांपासून काम

Chandrayaan 3 : चंद्रयान ३ ही भारतीची मोहीम यशस्वी झाली. जगभरात भारताच्या या मोहिमेचे कौतूक केले जात आहे. भारताच्या अंतराळ संस्थेने केलेल्या या कामगिरीत पुणे शहरातील एका कंपनीचा खारीचा वाटा आहे.

Chandrayaan : चंद्रयान-3 मध्ये पुणे शहरातील या कंपनीचा खारीचा वाटा, इस्त्रोसोबत अनेक वर्षांपासून काम
seth walchand hirachand doshiImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 12:43 PM

पुणे | 24 ऑगस्ट 2023 : भारतीय अंतराळ संस्थेच्या (इस्त्रो) इतिहासात 23 ऑगस्टचा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत जगातील पहिलाच देश ठरला आहे. आतापर्यंत फक्त तीन देशांची चंद्रावर मोहीम केली आहे. परंतु दक्षिण ध्रुवावर कोणताही देश पोहचू शकला नव्हता. यामुळे जगभरात इस्त्रोच्या कामगिरीचे कौतूक केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत पुढील मोहिमांची घोषणा केली आहे. इस्त्रोसोबत पुणे शहरातील एक कंपनी अनेक वर्षांपासून काम करत आहे. यामुळे चंद्रयान मोहिमेत या कंपनीचा खारीचा वाटा आहे.

कोणती कंपनी आहे सोबत

पुणे शहरातील वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड (WIL) ने चंद्रयान 3 मिशनमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. या मोहिमेसाठी वालचंदनगर कंपनीने इस्त्रोसोबत काम केले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड मागील 50 वर्षांपासून इस्त्रोसोबत काम करत आहे. 1973 पासून इस्त्रो सर्व उपक्रमासाठी WIL हार्डवेयर प्रॉडक्शन पार्टनर म्हणून काम करत आहे.

हे सुद्धा वाचा

चंद्रयानसाठी कशाची केली निर्मिती

WIL कंपनीने चंद्रयान 3 मिशनसाठी LVM3 लॉन्च वाहनात महत्वाचे असणारे बूस्टर सेगमेंट S200 ची निर्मिती केली. तसेच त्याची प्रूफ प्रेशर-टेस्टिंग करण्यात आली. LVM3-M4s सबसिस्टमसाठी फ्लेक्स, नोझल कंट्रोल टँकेज आणि S200 फ्लेक्स नोझल वालचंदनगर इंडस्ट्रीजने बनवले.

कंपनीची स्थापना कधी झाली

वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची स्थापना 1908 मध्ये झाली. इंजीनिअरिंग उत्पादनात ही कंपनी काम करते. पुणे शहरापासून 135 किमी लांबीवर बारामती आणि इंदापूर दरम्यान ही कंपनी आहे. कंपनीची स्थापना सेठ वालचंद हिराचंद दोशी यांनी केली होती. कंपनी संरक्षण, एअरोस्पेससारख्या क्षेत्रातही काम करत आहे. इस्त्रोसोबत 1973 पासून ही कंपनी कार्यरत आहे.

पहिला शिपिंग यार्ड बनवला

वालचंद कंपनीने देशात पहिला शिपिंग यार्ड बनवला होता. यामुळे 5 एप्रिल 1919 रोजी पहिला स्वदेशी जहाज समुद्रात उतरवला. शिपिंग यार्डसोबत पहिला विमान कारखानाही कंपनीने दिला. कंपनी शिपिंग, एव्हिएशन, ऑटोमोबाइल क्षेत्रात काम करत आहे.

Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.