AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजनाथ सिंह यांच्याकडून गिरीश बापट कुटुंबियांची भेट; म्हणाले, आम्ही…

DIAT चा पदवीदान समारंभ; कुलपती राजनाथ सिंह यांच्या हस्ते पदवी प्रदान; राजनाथ सिंह यांच्याकडून गिरीश बापट कुटुंबियांचीही भेट

राजनाथ सिंह यांच्याकडून गिरीश बापट कुटुंबियांची भेट; म्हणाले, आम्ही...
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 1:37 PM

पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गिरीश बापट यांच्या निवासस्थानी भेट दिली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन झालं. त्याच अनुषंगाने आज पुणे दौऱ्यावर असताना राजनाथ सिंह यांनी बापट कुटुंबीयांची सांत्वन्पर भेट घेतली आहे. यावेळी आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत, असं राजनाथ सिंह म्हणाले.

पुण्यात DIAT अर्थात Defence Institute of Advanced Technology चा 12वा पदवी प्रदान समारंभ आज पार पडला. देशाचे संरक्षण मंत्री आणि DIAT चे कुलपती राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा पदवी प्रदान समारंभ पार पडला.यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.

DIAT या संस्थेने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन केलं आहे. देशात आर्थिक,सामाजिक बदल घडत आहेत. त्यामुळे विज्ञान, तंत्रज्ञान यामुळे युद्ध कौशल्य बदलत आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये युद्धाच्या पद्धती बदलत आहेत. आता काही नव्या पद्धती सायबर किंवा स्पेस वॉर येत आहेत. यामुळे आपल्याला अधिक सतर्क राहून तंत्रज्ञान अद्ययावत करण्यावर भर द्यायला हवा, असं राजनाथ सिंह म्हणाले.

संशोधन वाढवायला लागणार आहे. त्याच्या सरंक्षण संस्थेला फायदा होईल DIAT ने आपल्या स्थापनेपासूनच संशोधन आणि प्रशिक्षणात खूप चांगले काम केलं आहे. यामध्ये आता आणखी संशोधन होणं आवश्यक आहे आपल्या संरक्षण संशोधनात वाढ करायला हवी, तर याचा सर्वसामान्य नागरिकांनाही उपयोग होईल, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

सेल्फ रिलायन्स हे अतिशय महत्त्वाचे आहे. संपूर्ण जग ग्लोबल विलेज बनलं आहे. भारतसारखा देश इम्पोर्टवर अवलंबून राहू शकत नाही, असंही राजनाथ सिंह म्हणालेत.

देशाच्या हिताप्रमाणे आपल्याला संरक्षक संसाधनं बनवता आले पाहिजेत. आपण अनेक देशांना आज संसाधन देतोय. बाहेर पाठवतोय. 16 हजार करोड पेक्षा जास्त किमतीचे संसाधन आपण एक्सपोर्ट करतो. रायफल पासून ब्रह्मोसपर्यंत सगळं आपण बनवतो. आर्थिक स्थितीप्रमाणे आपण आज टॉप 5 मध्ये आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 2047 पर्यंत भारत विकसित देश असेल, असा विश्वास राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

नेव्हीगेशन सिस्टीम असो वा प्लास्टिक सर्जरी याचे संशोधन पहिल्यांदा संरक्षण क्षेत्रात झाले. याचा सर्वाधिक उपयोग आता सर्वसामान्य नागरिकांना होतोय, असं म्हणत राजनाथ सिंह यांनी संरक्षण क्षेत्रातील कामाचं कौतुक केलं आहे.

तुम्ही असे तंत्रज्ञान तयार करा की ज्याचा वापर सर्वसामान्य नागरिकांनाही करता येईल. आपल्या गरजांची पूर्तता आपल्याला स्वतः करायची आहे. आपण जितकं आयात करतो तितके आपलं उत्पन्न घटतं. आत्मनिर्भर झाल्याने आपली अर्थव्यवस्था बळकट होईल. आपण संरक्षण क्षेत्रात किती उपकरणं बनवतो, त्यातील किती निर्यात करतो यावर ताकद वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.