Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Shetty : महाराष्ट्राला भोंगा मंदिरावर वाजतो की मशीदीवर हे महत्वाचे नाही : राजू शेट्टी

कोणच्या व्यगावर किंवा आजारपनावर टीका टिपणी करणे माझ्या सुसंकृत मनाला बर वाटत नाही. म्हणून अशी टीका करणे योग्य नाही

Raju Shetty : महाराष्ट्राला भोंगा मंदिरावर वाजतो की मशीदीवर हे महत्वाचे नाही : राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 5:45 PM

पुणे : सध्या देशभरात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa), मशिद भोंग्यावरुन वाद सुरु आहे. याच मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या आपल्या बीकेसीच्या सभेत तोफ डागली होती. त्यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetty) यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राला भोंगा मंदिरावर वाजतो की मशीदीवर हे महत्वाचे वाटत नाही. तर महाराष्ट्राच्या ग्रामिण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या शेती पिकाला भाव मिळत नाही, पाण्यासाठी वणवन फिरावं लागतं हे महत्वाचं आहे. तर मराठवाड्यात उभा ऊस आहे तसाच आहे. उसाला तोड मिळत नाही म्हणून शेतकरीआत्महत्या करत आहे. परंतु सत्तेत असणारे आणि विरोधात असणारे इतर प्रश्नावर चर्चा करतात ही दुर्दैवाची बाब असल्याचे म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारला (Mahavikas Aghadi government) टोला लगावला आहे.

दुर्दैवाची बाब

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे पुण्यात आले असता बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना, राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष द्यायाला सरकारला वेळ नाही मात्र सत्तेत असणारे आणि विरोधात असणारे इतर प्रश्नावर चर्चा करतात ही दुर्दैवाची बाब असल्याचे म्हटले आहे. तसेच ज्या ज्या आघाड्या आता देशात आहेत त्यांनी सर्वात पहिलं आम्ही जणसामान्यांसाठी आहोत ही भावना ठेवावी. त्यांचे प्रश्न सोडविल्या शिवाय हटणार नाही असा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण करावा. त्यांना तसे करावेच लागेल. परंतु कोणत्याही आघाडीने असा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण केला नाही. मात्र तो विश्वास निर्माण केला तर जनता नक्कीच त्यांच्या मागे उभी राहील, असा विश्र्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

केतकीचा समाचार

तसेच त्यांनी यावेळी अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या शरद पवार यांच्या टीकेला उत्तर ही दिलं. ते म्हणाले, कोणच्या व्यगावर किंवा आजारपनावर टीका टिपणी करणे माझ्या सुसंकृत मनाला बर वाटत नाही. म्हणून अशी टीका करणे योग्य नाही.

हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....