Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय हेतूनं कृष्ण प्रकाश यांची बदली; पिंपरी चिंचवडच्या रिपब्लिकन युवा मोर्चानं मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पाठवला मेल

पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांची बदली राजकीय हेतूने झाल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे (Rahul Dambale) यांनी केला आहे.

राजकीय हेतूनं कृष्ण प्रकाश यांची बदली; पिंपरी चिंचवडच्या रिपब्लिकन युवा मोर्चानं मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पाठवला मेल
कृष्णप्रकाश यांची बदली रद्द करण्याची मागणी करताना राहुल डंबाळेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 10:47 AM

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांची बदली राजकीय हेतूने झाल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे (Rahul Dambale) यांनी केला आहे. ही बदली अन्यायकारक आणि चुकीची असून महानगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन केलेली बदली असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना मेलद्वारे त्यांची बदली करू नये, अशी विनंती करण्यात आली आहे. परंतु महानगरपालिका निवडणूक (PMC Election) लक्षात घेता आणि निःपक्षपाती कारवाई होण्याचा फटका बसू शकतो, या धास्तीने ही बदली केल्याचे डंबाळे यांनी म्हटले आहे. पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचे जनमत हे कृष्ण प्रकाश यांची बदली रद्द होण्याच्या बाजूचे आहे. सरकारने याचा सन्मान करीत कृष्णप्रकाश यांना पोलीस आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवडचा आयुक्त पदाचा निर्धारित कालावधी पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली करू नये, अशी विनंती राज्य सरकारकडे करीत आहोत, असे डंबाळे यांनी सांगितले आहे.

20 एप्रिलला झाली बदली

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे धडेबाज पोलीस आयुक्त, आयर्नमन, अशी आयपीएस कृष्ण प्रकाश यांची ओळख आहे. त्यांची 20 एप्रिलला बदली करण्यात आली. त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांनी पोलीस आयुक्तालयाचा पदभार नुकताच स्वीकारला. त्यांच्यासह मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

का रद्द करावी बदली?

गुन्हेगारांना अद्दल घडवण्यात पटाईत असल्याच्या बऱ्याच चर्चा होत्या. कारण एका खून प्रकरणातील आरोपीला पकडताना त्यांनी केलेल्या एका कृतीची बरीच चर्चा होती. त्यांनी झाड फेकून मारल्याचा दावा चांगलाच चर्चेत होता. सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचे धोरणही अनेकांना आवडले होते. त्यासाठी त्यांनी कृष्ण प्रकाश यांनी स्वत:चा मोबाइल क्रमांकदेखील सार्वजनिकरित्या सांगितला होता. त्यामुळे त्यांचा लोकसहभागही वाढला होता. मात्र काही कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना खटकल्याच्या चर्चा होत्या. काही वेळेला ते वेशांतर करून गुन्हेगाराला पकडण्यासाठी किंवा आपल्याच हद्दीतील पोलिसांचा कारभार पाहण्यासाठी पोहचत.

आणखी वाचा :

PMPML : पुण्यातील पीएमपीएमएलची सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल

Pune crime : सोनं अन् मोबाइल लुटणारे 24 तासांत गजाआड; लोणावळ्यातल्या टायगर पॉइंटजवळ शस्त्रांचा धाक दाखवून करत होते चोरी

Pune crime : तिकीट काढलं कोलकात्याचं, रवानगी थेट तुरुंगात! महागड्या सायकल चोरणाऱ्यांना पुण्यातील स्वारगेट पोलिसांचा हिसका

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.