Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय तृतीयेनंतर हापूस आंब्याचे दर काय? सध्या किती होतेय आवाक

Alphonso mangoes : अक्षय तृतीयेनंतर हापूस आंब्याचे दर कमी होतात. परंतु यंदा परिस्थिती वेगळी आहे. अवकाळी पावसाचा फटका हापूस आंब्याला बसला आहे. यामुळे यंदा दर कमी झाले का? हा प्रश्न आहे. परंतु अजून दिलासा मिळालेला नाहीय.

अक्षय तृतीयेनंतर हापूस आंब्याचे दर काय? सध्या किती होतेय आवाक
hapus mango
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 3:12 PM

पुणे : हापूस आंबा खरेदीसाठी मुंबई आणि पुणेकरांनी गर्दी केली आहे. परंतु यंदा अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे हापूस आंब्याचे उत्पादन 30 ते 40 टक्क्यांनी घटले असल्याचे उत्पादक सांगत आहेत. मार्केटमध्ये आंब्याची आवक घटल्याने मोठी भाव वाढ आहे. अक्षय तृतीयेनंतर हापूस आंब्याचे दर कमी होतात. परंतु यंदा अजूनही दर कमी झालेले नाही. यंदा भाव खाणारा हापूस आंबा गोड कधी होणार? याची प्रतिक्षा आंबाप्रेमी करत आहेत. परंतु सध्यातरी चढ्या भावानेच आंब्या घ्यावा लागणार आहे.

मुंबईत किती झाली आवाक

नवी मुंबईतील एपीएमसीतील फळ बाजारपेठेत राज्यातून 18,526 तर इतर राज्यातून 21,942 इतक्या हापूस आंब्याच्या पेटींची आवक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हापूस आंब्याची आवक कमी झाल्याने भाव वाढले आहेत. एप्रिल महिन्यात अक्षय तृतीयेनंतर हापूस आंबा मोठ्या प्रमाणावर येतो. मुख्य हंगाम असून देखील आवक कमी होत आहे. त्यामुळे हापूस आंब्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईतील एपीएमसीमध्ये हापूस आंब्याच्या प्रती पेटीचा दर दोनशे रुपयांनी वाढलेला आहे. सध्या हापूस आंब्याची एक पेटी 2200 ते 5200 रुपयांना मिळत आहे. आधीचे हापूस आंब्यांचे प्रतीपेटी दर हे 2000 ते 5000 हजारपर्यंत होते.

हे सुद्धा वाचा

पुणे शहरात काय आहेत दर

पुणे शहरात हापूस आंब्याचे दर चढेच आहेत. किरकोळ विक्रीचा दर 800 ते 1,200 रुपये डझन आहे. घाऊक बाजारात 4 ते 6 डझनचे बॉक्स 2,500 ते 3,000 रुपये दराने मिळत आहे. तसेच 5 ते 10 डझनचे बॉक्सचे दर 3,500 ते 6,000 रुपये आहे.

का वाढले दर

यंदा अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचे दर वाढले आहे. अवकाळी पावसाचा फटका हापूस आंब्याला बसला आहे. यामुळे उत्पादन कमी झाले असून दर वाढलेले आहे. अक्षय तृतीयेनंतरही हापूसचे दर वधारून आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हापूसचा म्हणावा तसा आस्वाद आत्तापर्यंत तरी घेता आला नाही. ही कसर हापूसनंतर येणारा केसर (Kesar mango) भरून काढेल, अशी आशा होती. परंतु ती ही अजून पूर्ण झाली नाही.

कोकणातूनच सर्वाधिक आवक

यंदा हापूसच्या उत्पादनात घट झाली आहे. परंतु या त्या उत्पादनातून अधिकचा फायदा होण्याच्या दृष्टीने उत्पादकांनी गणिते मांडली होती. त्यामुळे दर वाढले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये कोकणातून सर्वाधिक आवक होत आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.