AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडी काळात फक्त घोषणा, काम विद्यमान सरकार करतंय, श्रीकांत शिंदे यांचा दावा

मात्र हे सरकार आल्यानंतर तीन महिन्यात जास्त काम करण्याचं काम या सरकारने केले.

महाविकास आघाडी काळात फक्त घोषणा, काम विद्यमान सरकार करतंय, श्रीकांत शिंदे यांचा दावा
श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Nov 07, 2022 | 3:50 PM

पुणे : पुण्यातील शिरूर येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सभा घेतली. यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले, पाणी योजना ही खूप मोठी योजना आहे. जसे हर घर शौचालय तशीच हर घर जल ही योजना आहे. प्रत्येकाच्या घरात नळाद्वारे पाणी कसे पोहोचेल अशी योजना आहे. यामुळे 50 टक्के योगदान राज्य सरकार देते. देशात अजून खूप गावे आहेत त्याठिकाणी पाणी मिळत नाही.

मी राजकीय काही बोलत नाही. मात्र हे सरकार आल्यानंतर तीन महिन्यात जास्त काम करण्याचं काम या सरकारने केले. हे सरकार सतत काम करत आहे, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.

श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रोज लोकांमध्ये फिरून काम करत आहेत. मागच्या वेळी फक्त घोषणा झाल्या आणि या केलेल्या घोषणाची अंमलबजावणीचं काम हे सरकार करत आहे.

कधीही कोणी विचार केला नव्हता की, ही दिवाळी मुख्यमंत्री वर्षावर शेतकऱ्यांसोबत साजरी करतील. म्हणून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता. पुढील येणाऱ्या काळामध्ये चांगली काम केली जातील.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या योजना करताना लोकसंख्येचा विचार करून योजना करत आहेत. मोदींनी लोकांसाठी मोठ्या योजना आणत लोकांना त्याचा फायदा होईल, याचा विचार केला.

पुढील दोन वर्षात निवडणुका होतील. तोपर्यंत आपल्याला विकास कामांचा वेग वाढविला पाहिजे. पश्चिम भागातील शेतकऱ्यांना कर्ज माफीचा फायदा होत नाही. मात्र आता नियमित कर्ज भरणाऱ्याला आपण सूट देणार आहोत.

सत्ता परिवर्तन होईल का नाही, तसं पावसाचं गणित झालं आहे. पाऊस झाल्यावर शेतीचे नुकसान होतंय. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करत आहोत. नुकसान भरपाईचा दर वाढविला आहे. तात्काळ पंचनामे करून भरपाई दिली. खूप योजना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आणल्यात.

हा भाग उसाचा क्षेत्र असलेला आहे. कारखाने आहेत त्यातून शेतकऱ्याला उसाला कसा भाव जास्त देत येईल, हे आपण पाहतोय. उसाचा एमआरपी आणि इथेनॉलचे दर कसे देता येतील, ते आम्ही पाहत आहोत, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा.
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री.