Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी चिंचवडमध्ये पाणीबाणी; नागरिकांसाठी पालिकेचा मोठा अलर्ट

एकीकडे कोरोनाचं संकट तर आता दुसरीकडे पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये पाणीबाणी; नागरिकांसाठी पालिकेचा मोठा अलर्ट
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 9:37 AM

पिंपरी चिंचवड : राज्यात आधीच कोरोनाच्या महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशात पुण्यात कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका आहे. एकीकडे कोरोनाचं संकट तर आता दुसरीकडे पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद राहणारा असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. (water supply will be cut off today and tomorrow in pimpri Chinchwad)

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा दिला जाणाऱ्या रावेत इथल्या जलउपसा केंद्रातील उच्चदाब वीज संच मांडणीचं अचानक काम उद्भवलं आहे. उपस्कर वाहिनीचे तातडीने दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्याने संपूर्ण शहरात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती आहे.

पालिकेने सांगितल्यानुसार, आज सकाळी 11 ते 12.30 या कालावधी जलउपसा बंद राहणार आहे. त्यामुळे 12 नंतरचा, सायंकाळचा आणि रात्रीचा तसंच दूसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे चिंचवडकरांनी याची दक्षता घेत पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पुरेसा पाणीसाठा घरात भरून ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचं आवाहन महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे. (water supply will be cut off today and tomorrow in pimpri Chinchwad)

खरंतर, यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे पुणेकरांची तहान भागवणारी सर्व धरणं चांगली भरली आहेत. त्यामुळे वर्षभरासाठी पुणेकरांची तहान भागली असं म्हणायला हरकत नाही. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने चारही धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. चारही धरणांमध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत 18.13 टीएमसी म्हणजेच 62.21% टक्के पाणीसाठा होता, आता त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभर तहान भागणार आहे. पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी जलसाठा आहे.

गेल्या वर्षीच्या 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्क्याच्या तुलनेत जलसाठा कमी आहे. त्यामुळे यंदा धरण पूर्ण भरल्यास जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. जुलै महिन्यात पाणी साठा कमी झाल्यानं पाणी कपातीची टांगती तलवार होती.

इतर बातम्या – 

ट्रम्प खरंच कोरोना पॉझिटिव्ह होते की होता पॉलिटिकल स्टंट? अमेरिकेत चर्चेला उधाण
Alert! ताशी 24046 किमी वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतोय लघुग्रह, विमानाइतका आहे आकार

(water supply will be cut off today and tomorrow in pimpri Chinchwad)

लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.