AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! राज्याच्या सत्ता संघर्षाचा ‘निक्काल’ कधी?; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी तारीखच सांगितली

एक महिना होत आला तरी राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने अजून निकाल दिला नाही. त्यामुळे या निकालाकडे सर्वच राजकीय पक्षाचं लक्ष लागलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी कोर्टाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

मोठी बातमी ! राज्याच्या सत्ता संघर्षाचा 'निक्काल' कधी?; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी तारीखच सांगितली
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 8:47 AM

पुणे : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केवळ महाराष्ट्रासाठीच महत्त्वाचा नाही तर देशातील भविष्यातील राजकीय घडामोडींसाठी ही मार्गदर्शक असाच ठरणारा असणार आहे. ही सुनावणी पूर्ण होऊन महिना होत आला तरी अजून कोर्टाने निकाल दिलेला नाही. त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटामध्येही धाकधूक निर्माण झाली आहे. या निकालावर राज्यातील सत्ताकारणाचं भवितव्य ठरणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निकालाची तारीख अजून जाहीर केलेली नाही. मात्र, राज्यातील सत्तासंघर्षवर 11 मे रोजी निकाल येण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रसिद्ध घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांची टीव्ही 9 मराठीला दिली आहे. सुप्रीम कोर्टाकडून तशा हालचाली सुरू झाल्याची माहितीही बापट यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या 11 मे रोजी काय घडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

लवकरच निकाल लागेल

दरम्यान, प्रसिद्ध वकील उज्जवल निकम यांनीही राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर भाष्य केलं होतं. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल केव्हा लागेल हे आता जरी सांगणे कठीण असले तरी माझ्या मते सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठातील काही न्यायाधीश निवृत्त होत असल्याने हा सत्ता संघर्षाचा निकाल लवकर लागेल, अशी अपेक्षा आहे, असं उज्जव निकम म्हणाले.

निकम यांना राजकारणात येणार का? असा सवाल केला असता त्यांनी नाही असं म्हटलं. सध्यातरी माझा राजकारणात येण्याचा विचार नाही. कारण सध्या राजकारणात जी अस्थिरता आणि गढुळता आहे, ती पाहता माझ्यासारख्या व्यक्तींनी राजकारणात येणं योग्य नाही, असं माझं मन सांगत आहे, असं निकम म्हणाले.

आठवडा महत्त्वाचा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सत्ता संघर्षावर भाष्य केलं होतं. येणारा आठवडा महाराष्ट्रासाठी परिवर्तनाचा ठरणार असून या आठवड्यात अनेक राजकीय घटना घडतील. जनेतला लुटण्याचे काम आणि 105 सर्वाधिक आमदार येऊन देखील भाजपाने राज्यात तमाशा केलाय, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

10 तारखेनंतर निकाल

प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनीही सत्ता संघर्षावर भाष्य केलं आहे. येत्या 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येईल. 10 तारखेनंतर सत्तासंघर्षवर निकाल येण्याची शक्यता आहे, असं असीम सरोदे यांनीही म्हटलं होतं. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.