Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

१२२ वर्षानंतर फेब्रुवारी महिना ठरला सर्वाधिक हॉट, का वाढतेय तापमान?

फेब्रुवारी महिन्यात सरासरी तापमान चांगलेच वाढले होते. १९०१ नंतर हे सर्वाधिक सरासरी तापमान होते. तसेच यंदा मार्चमध्येही तापमानाचा नवा विक्रम होऊ शकतो.

१२२ वर्षानंतर फेब्रुवारी महिना ठरला सर्वाधिक हॉट, का वाढतेय तापमान?
तापमान वाढ
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 8:23 AM

पुणे : यंदाचा २०२३ ची सुरुवात कडाक्याच्या थंडीने झाली होती. देशभरात थंडीची लाट पसरली होती. यामुळे यंदा तापमान कमी राहणार, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु यंदा फेब्रुवारी महिना १९०१ नंतर आतापर्यंतचा सर्वात उष्ण राहिला. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा फेब्रुवारी महिन्यात सरासरी तापमान २९.५ अंश सेल्सियसवर गेले होते. १९०१ नंतर हे सर्वाधिक सरासरी तापमान होते. तसेच यंदा मार्चमध्येही तापमानाचा नवा विक्रम होऊ शकतो. फेब्रुवारी २०२३ मध्ये देशातील सरासरी तापमानाने २९.५ अंश सेल्सियसवर जाऊन पोहचले होते. यापूर्वी २०१६ मध्ये सरासरी तापमान सर्वाधिक २७.८ अंश होते.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १९०१ पासून ते आतापर्यंत फेब्रुवारी २०२३ चे कमाल तापमान सर्वाधिक राहिले. तसेच किमान तापमान पाचव्या स्थानी राहिले. देशातील मध्य भारतात मार्चमध्येच उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

देशामध्येच अधिक तापमान

फेब्रुवारीत उत्तर व पश्चिम भारत म्हणजे राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, यूपी सरासरी कमाल तापमान ३.४० अंश जास्त होते. या भागात २४.८६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. यापूर्वी १९६० मध्ये ते २४.५५ अंश होते. मध्य भारतासाठी म्हणजेच मप्र, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरातमध्ये आतापर्यंतचा दुसरा सर्वात उष्ण फेब्रुवारी ठरला. यंदा येथे फेब्रुवारीचे सरासरी कमाल तापमान ३१.९३ अंश राहिले. २००६ मध्ये ते ३२.१३ अंश होते.

का वाढतेय तापमान

एका रिपोर्टनुसार, गरम हवा वाहण्यामागे अनेक कारणे आहेत. वसंत ऋतूमध्ये वारा सहसा पश्चिम-वायव्येकडून वाहतो. या दिशांनी वाहणाऱ्या वाऱ्यामुळे, मध्यपूर्वेतील इतर प्रदेशांपेक्षा मध्यपूर्व प्रदेश अधिक वेगाने गरम होत आहे. तसेच विषववृत्ताच्या जवळ अक्षांश आहेत आणि ते भारताच्या दिशेने वाहणाऱ्या उबदार हवेचा स्रोत म्हणून काम करते.

तसेच वायव्येकडून वाहणारे वारे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या पर्वतरांगांवर वाहतात. जे भारतात वाहणारे वारे तापवत आहेत. ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही हवामानात अशाप्रकारे बदल होताना दिसत आहेत, मात्र गेल्या काही वर्षांत हा प्रकार अधिकच पाहायला मिळत आहे. वातावरणात हळूहळू होत असलेल्या बदलांमुळे हवामानाचे स्वरूप बदलत असून उन्हाळ्याचे दिवस वाढत आहेत.

तापमान लवकर का वाढले

फेब्रुवारीचे तापमान आणि मार्च महिन्यातील उष्णतेचा अंदाज पाहता उष्णतेची लाट लवकरच सुरू होणार आहे. पावसाचा अभाव हे प्रमुख कारण आहे. मैदानी आणि डोंगराळ भागात पावसाची कमतरता दिसून आली. कमी पावसाचा परिणाम म्हणून हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या भागात तापमानात झपाट्याने वाढ झाली.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.