Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदेशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घालावी, देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांवरही लक्ष ठेवण्याची गरज : राजेश टोपे

देशांतर्गत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांवरही लक्ष देण्याची गरज असल्याचा सूर या बैठकीत उमटला. याबाबत अद्यापतीर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

विदेशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घालावी, देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांवरही लक्ष ठेवण्याची गरज : राजेश टोपे
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 8:45 PM

मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट अर्थात ओमिक्रॉन या नव्या विषाणूमुळे राज्य सरकारने खबरदारी म्हणून निर्बंध जारी केले आहेत. आज झालेल्या बैठकीत धोकादायक देशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच देशांतर्गत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांवरही लक्ष देण्याची गरज असल्याचा सूर आजच्या बैठकीत उमटला. याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

डोमॅस्टिक प्रवाशांवरही लक्ष देण्यात यावं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच अन्य अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. काही प्रवाशी धोकादायक देशातून येत नाहीत. मात्र डोमॅस्टिक पॅसेंजर म्हणून आलेल्या प्रवाशांवरही लक्ष द्यायला हवं. डोमॅस्टिक प्रवाशांच्या बाबतीत वेगळी नियमावली काढण्यासंदर्भात केंद्र सरकार, भारत सरकारचा आरोग्य विभाग तसेच राज्य सरकार विचार करतील. एखादा व्यक्ती रिस्क कंट्रीतून आला नसेल तर त्याची तपासणी केली जात नाही. मात्र, तरीही पाच टक्के लोकांची टेस्ट करण्यास सांगितलं आहे. या सर्वांचा पासपोर्ट तपासून त्यांच्या तपासण्या करण्यात येणार आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

ज्या गोष्टी अनलॉक आहेत, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही

तसेच आपल्या देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार डेंजर आहे हे सिद्धही झालं नाही. मी अभ्यास करून माहिती देत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दहशतीखाली राहू नये. ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला नसल्याने सध्या ज्या गोष्टी अनलॉक आहेत, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. जे उद्योगधंदे सुरू आहेत. ते तसेच सुरू राहितील. त्यात काही बदल केला जाणार नाही. शिवाय येत्या 1 डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी माझं याबाबत बोलणंही झालं आहे, असं टोपे यांनी सांगतिलं.

इतर बातम्या :

महिलांवरील अत्याचार वाढण्यास आघाडी सरकारच जबाबदार; चित्रा वाघ यांचा जोरदार हल्लाबोल

Maharashtra School Reopening | राज्यात शाळा 1 डिसेंबरपासूनच सुरु होणार, शासन निर्णय जारी

VIDEO: दोन लग्न आणि एका साखरपुड्याची गोष्ट! राऊत, ठाकूर, पाटलांच्या घरी सनई चौघड्यांचे सूर; पाहा, विवाह सोहळ्यांचा थाटमाट

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.